शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Rain Update: तेलंगणामध्ये पावसाने १५, तर आंध्रात १० ठार; जिल्हाधिकाऱ्यांना अतिशय सावध राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:17 IST

तेलंगणामध्ये दोन दिवस खासगी संस्थांना सुटी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.

हैदराबाद : हैदराबाद शहर आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांत झालेला जोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १५ जण ठार झाले. पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचले. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसामुळे हैदराबादेतील वेगवेगळ्या भागांत घरांच्या भिंती पडून मृत्यू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने पावसाच्या पार्श्वभूमीवर येथील आऊटर रिंग रोडवरील बुधवारी आणि गुरुवारी सगळ्या खासगी संस्था, कार्यालये, जीवनावश्यक नसलेल्या सेवांना सुटी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवसांत लोकांनीही राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

तेलंगणचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव, पशूधन विकास मंत्री तेलासानी श्रीनिवास यादव यांनी वरिष्ठ अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन मदत व बचाव कामाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी येथील गगनपहाड वसाहतीत घर कोसळून मुलासह कुटुंबातील तीन जण मरण पावले. चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भिंती कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. दुसºया एका घटनेत इब्राहीमपुºयात मंगळवारी रात्री महिला (४०) आणि तिची मुलगी घराचे छत अंगावर पडून मरण पावल्या. ग्रेटर हैदराबाद मनपा हद्दीत कमालीचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत पाणीचपाणी तुंबले. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सगळ््या जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना अतिशय दक्ष राहण्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.आंध्र प्रदेशमध्ये रस्त्यांची मोठी हानीअमरावती : आंध्र प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांत झालेलाजोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. जोरदार पावसामुळे रस्त्यांची मोठी हानी झाली व अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे गेल्या २० दिवसांत दुसºयांदा कृष्णा नदीला बुधवारी पूर आला.अधिकाºयांच्या बैठकीत आढावा६.४६ लाख क्युसेक पाणी आंध्र प्रदेशमधील प्रकासम धरणातून सोडले जात असल्यामुळे दुसºयांदा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. या पाण्यामुळे धरणाच्या काठाला असलेल्या वसाहतींना धोका निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा उच्च पातळीवरील बैठकीत घेतला. रेड्डी यांनी पीडित कुटुंबांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेड्डी जिल्हाधिकाºयांशीही बोलले व त्यांना अतिदक्ष राहण्यास सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाRainपाऊस