शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Rain Update: तेलंगणामध्ये पावसाने १५, तर आंध्रात १० ठार; जिल्हाधिकाऱ्यांना अतिशय सावध राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:17 IST

तेलंगणामध्ये दोन दिवस खासगी संस्थांना सुटी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.

हैदराबाद : हैदराबाद शहर आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांत झालेला जोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १५ जण ठार झाले. पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचले. मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसामुळे हैदराबादेतील वेगवेगळ्या भागांत घरांच्या भिंती पडून मृत्यू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने पावसाच्या पार्श्वभूमीवर येथील आऊटर रिंग रोडवरील बुधवारी आणि गुरुवारी सगळ्या खासगी संस्था, कार्यालये, जीवनावश्यक नसलेल्या सेवांना सुटी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवसांत लोकांनीही राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

तेलंगणचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव, पशूधन विकास मंत्री तेलासानी श्रीनिवास यादव यांनी वरिष्ठ अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन मदत व बचाव कामाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी येथील गगनपहाड वसाहतीत घर कोसळून मुलासह कुटुंबातील तीन जण मरण पावले. चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भिंती कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. दुसºया एका घटनेत इब्राहीमपुºयात मंगळवारी रात्री महिला (४०) आणि तिची मुलगी घराचे छत अंगावर पडून मरण पावल्या. ग्रेटर हैदराबाद मनपा हद्दीत कमालीचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत पाणीचपाणी तुंबले. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सगळ््या जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना अतिशय दक्ष राहण्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.आंध्र प्रदेशमध्ये रस्त्यांची मोठी हानीअमरावती : आंध्र प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांत झालेलाजोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. जोरदार पावसामुळे रस्त्यांची मोठी हानी झाली व अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे गेल्या २० दिवसांत दुसºयांदा कृष्णा नदीला बुधवारी पूर आला.अधिकाºयांच्या बैठकीत आढावा६.४६ लाख क्युसेक पाणी आंध्र प्रदेशमधील प्रकासम धरणातून सोडले जात असल्यामुळे दुसºयांदा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. या पाण्यामुळे धरणाच्या काठाला असलेल्या वसाहतींना धोका निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा उच्च पातळीवरील बैठकीत घेतला. रेड्डी यांनी पीडित कुटुंबांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेड्डी जिल्हाधिकाºयांशीही बोलले व त्यांना अतिदक्ष राहण्यास सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाRainपाऊस