शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हैदराबादमध्ये पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:31 IST

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेपावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यूगरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलं आहेपुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

हैदराबाद - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एकूण 67.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सखल परिसरांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण शहरात वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. हैदराबाद महापालिकेने कर्मचा-यांना शहरात जमा झालेलं पाणी काढण्यासाठी आणि बचावकार्याच्या कामाला लावलं होतं. 

पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नायडूनगर येथे ही घटना घडली. तर विजेच्या धक्क्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेची माहिती घेतली असून महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी आणि पोलीस आयुक्त महेंदर रेड्डी यांना अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांना स्पष्ट आदेश देताना बचावकार्य आणि लोकांच्या मदतीसाठी सर्व ती तयारी करण्यास सांगितलं आहे. 

पावसाचा कहर लक्षात घेता परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे उस्मानिया विद्यापीठाने पुढील सरकारी आदेश मिळेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणा-या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.