शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हैदराबादमध्ये पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:31 IST

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेपावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यूगरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलं आहेपुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

हैदराबाद - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एकूण 67.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सखल परिसरांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण शहरात वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. हैदराबाद महापालिकेने कर्मचा-यांना शहरात जमा झालेलं पाणी काढण्यासाठी आणि बचावकार्याच्या कामाला लावलं होतं. 

पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नायडूनगर येथे ही घटना घडली. तर विजेच्या धक्क्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेची माहिती घेतली असून महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी आणि पोलीस आयुक्त महेंदर रेड्डी यांना अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांना स्पष्ट आदेश देताना बचावकार्य आणि लोकांच्या मदतीसाठी सर्व ती तयारी करण्यास सांगितलं आहे. 

पावसाचा कहर लक्षात घेता परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे उस्मानिया विद्यापीठाने पुढील सरकारी आदेश मिळेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणा-या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.