शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

हैदराबादमध्ये पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:31 IST

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेपावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यूगरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलं आहेपुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

हैदराबाद - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एकूण 67.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सखल परिसरांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण शहरात वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. हैदराबाद महापालिकेने कर्मचा-यांना शहरात जमा झालेलं पाणी काढण्यासाठी आणि बचावकार्याच्या कामाला लावलं होतं. 

पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नायडूनगर येथे ही घटना घडली. तर विजेच्या धक्क्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेची माहिती घेतली असून महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी आणि पोलीस आयुक्त महेंदर रेड्डी यांना अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांना स्पष्ट आदेश देताना बचावकार्य आणि लोकांच्या मदतीसाठी सर्व ती तयारी करण्यास सांगितलं आहे. 

पावसाचा कहर लक्षात घेता परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे उस्मानिया विद्यापीठाने पुढील सरकारी आदेश मिळेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणा-या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.