शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हैदराबादमध्ये पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:31 IST

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेपावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यूगरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलं आहेपुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

हैदराबाद - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगितलं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुढील 48 तासात अजून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत एकूण 67.6 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे सखल परिसरांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण शहरात वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. हैदराबाद महापालिकेने कर्मचा-यांना शहरात जमा झालेलं पाणी काढण्यासाठी आणि बचावकार्याच्या कामाला लावलं होतं. 

पावसामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये चार महिन्यांचा एक मुलगा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नायडूनगर येथे ही घटना घडली. तर विजेच्या धक्क्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घटनेची माहिती घेतली असून महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी आणि पोलीस आयुक्त महेंदर रेड्डी यांना अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांना स्पष्ट आदेश देताना बचावकार्य आणि लोकांच्या मदतीसाठी सर्व ती तयारी करण्यास सांगितलं आहे. 

पावसाचा कहर लक्षात घेता परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे उस्मानिया विद्यापीठाने पुढील सरकारी आदेश मिळेपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणा-या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.