शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पाऊस, वादळाचे ५० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:25 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.पावसाशी संबंधित दुर्घटनांत राजस्थानात २१, मध्यप्रदेशात १५, गुजरातेत १० आणि महाराष्ट्रात तीन जणांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल टिष्ट्वटरद्वारे तीव्र दु:ख व्यक्त केले. मोदी यांनी फक्त त्यांचे राज्य गुजरातमधील जीवितहानीबद्दलच दु:ख व्यक्त केले, असे म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीका केली. नंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी बिगरमोसमी पाऊस आणि वादळामुळे मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि देशाच्या इतर भागांत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. या संकटात सापडेल्यांना सर्व प्रकारची मदत देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.’ नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले आहेत, असेही पीएमओने म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पावसाचा फटका बसलेल्या भागांतील परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असून, या राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असे म्हटले.कमलनाथ टिष्ट्वटरवर म्हणाले की, ‘मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नाही. मध्यप्रदेशातही दहा जणांचा पाऊस, वीज व वादळाने बळी गेला आहे; परंतु तुमच्या भावना फक्त गुजरातपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. भलेही तुमच्या पक्षाचे इकडे सरकार नाही, तरीही येथे लोक राहतात.’भाजपने नाथ हे नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांवरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख व राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांनी दिल्लीत म्हटले की, ‘नाथ यांना नैसर्गिक दुर्घटनांत हानी झाल्यावर मदतीसाठी केंद्राला त्याची आधी माहिती द्यावी लागते, या प्रक्रियेची माहिती आहे. तरीही ते टिष्ट्वटरद्वारे टीका करून राजकारण करीत आहेत.’>पिकांचीही हानीया पावसाने गुजरात आणि राजस्थानात पिकांचीही हानी झाली आहे. राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या घटनांत जनावरेही दगावली आहेत.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून ७१ वर्षांची महिला, ३२ वर्षांचा तरुण आणि मंदिराचा पुजारी मरण पावला.