शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

Mumbai Local:”…तर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होईल”; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:42 IST

Raosaheb Danve: आजच मी खात्याचा कारभार स्वीकारला आहे. पुढची दिशा काय असेल ते अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सांगू शकतो.

ठळक मुद्देरेल्वे हे सर्वसामान्यांच्या गरजेचे वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा देण्यावर प्राधान्य असेलब्रिफिंग घेऊन सध्या काय स्थिती आहे आणि यापुढे रेल्वे खात्यासाठी काय करावं लागेल हे सांगता येईलमहाराष्ट्रातील गरजा, मराठवाडा यासाठी काय करता येईल यावर माझं प्राधान्य असेल

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवेंनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येतो.

याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अन्न पुरवठा खात्यातही चांगले काम केले. या देशातील ८० कोटी जनतेला २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ देण्याचं काम सरकारने केले. आता रेल्वे खात्याची जबाबदारी मिळाली आहे. ब्रिफिंग घेऊन सध्या काय स्थिती आहे आणि यापुढे रेल्वे खात्यासाठी काय करावं लागेल हे सांगता येईल. महाराष्ट्रातील गरजा, मराठवाडा यासाठी काय करता येईल यावर माझं प्राधान्य असेल असं दानवेंनी सांगितले.

आजच मी खात्याचा कारभार स्वीकारला आहे. पुढची दिशा काय असेल ते अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सांगू शकतो. रेल्वे हे सर्वसामान्यांच्या गरजेचे वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा देण्यावर प्राधान्य असेल. लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आहे. जेव्हा कधी राज्य सरकारला वाटेल कोरोना स्थिती आटोक्यात आली आहे, रेल्वे सेवा सुरू करायला हवी तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा सुरू करू त्यात काही अडचण नाही असंही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टपणे सांगितले. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अलीकडेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्वसामान्यांच्या मुंबई लोकल प्रवासाबाबत भाष्य केले होते. विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. गर्दीचं ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

कसा करावा लागतो लोकल प्रवास?

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मर्यादित पातळीवर मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवल्यावर पुन्हा एकदा लोकल प्रवासबंदी करण्यात आली. कोरोनाच्या काळात लोकल प्रवासास बंदी असल्यामुळे अनेक प्रवाशांकडून बोगस ओळखपत्र दाखवून प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ऑनलाइन यंत्रणेद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर क्युआर कोड येणार आहे. हा क्युआर कोड रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतरच सदर कर्मचाऱ्यांना पास मिळणार असून, तसा निर्णय व नियोजन राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अधिकारपत्र दाखवून एकात्मिक पास मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील एक पत्रही रेल्वेला दिल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMumbai Localमुंबई लोकलcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार