शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

48 गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देत रेल्वेने केली तिकीटाच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 13:36 IST

भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे.परफास्ट ट्रेनमधून प्रवास करताना आता प्रवाशांना 30 ते 75 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करताना आता प्रवाशांना 30 ते 75 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. या 48 गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केल्याने 70 कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे. रेल्वेने 48 गाड्यांचा समावेश सुपरफास्ट प्रकारात केल्याने आता सुपरफास्ट गाड्यांची एकूण संख्या 1 हजार 72 झाली आहे.

रेल्वेने ज्या 48 गाड्यांच्या तिकीटाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. त्या गाड्यांमधील स्लिपर कोचचं तिकीट 30 रुपयांनी, सेकंड आणि थर्ड एसीचं तिकीट 45 रुपयांनी आणि फर्स्ट एसीचं तिकीट 75 रुपयांनी वाढवलं गेलं आहे. त्यामुळे पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-चंदिगढ एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-नांदेड एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस, कानपूर-उधमपूर एक्स्प्रेस, छपरा-मथुरा एक्स्प्रेस, रॉक फोर्ट चेन्नई-तिरुचिलापल्ली एक्स्प्रेस, बंगळुरु-शिवमोगा एक्स्प्रेस, टाटा-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, दरभंगा-जालंधर एक्स्प्रेस, मुंबई-मधुरा एक्स्प्रेस आणि मुंबई-पाटणा एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जादा पैसै मोजावे लागणार आहेत. 

 रेल्वेने ज्या गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन अतिरिक्त तिकीट दर लागू केले आहेत, त्यांच्या वेगात फार मोठा फरक पडलेला नाही. या गाड्यांचा वेग फक्त 5 किलोमीटर प्रतितास इतका वाढला आहे. त्यामुळे आधी 50 किलोमीटर प्रतिसास वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या आता 55 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतील. पण रेल्वेच्या वेगामध्ये झालेली ही वाढ सोडली तर रेल्वेकडून इतर कोणत्याही नव्या सेवा देण्यात आलेल्या किंवा रेल्वेत नव्या सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय रेल्वेचा वेग वाढल्यावरही त्या वेळेवर धावतील, याची कोणतीही खात्री नाही. उत्तर भारतात हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे बऱ्याच रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. याला राजधानी, दुरान्तो, शताब्दी यांच्यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

कॅगच्या गेल्या रिपोर्टमध्ये रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढेले होते. प्रवाशांकडून सुपरफास्ट चार्ज वसूल केला जातो पण ट्रेन सुपरफास्ट जात नाहीत तसंच तेथे इतर सुविधाही दिल्या जात नाहीत, असं कॅगने अहवालात म्हंटलं होतं. रेल्वे प्रवासात प्रवाशांना योग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर सुपरफास्ट चार्ज परत करण्याची कुठलीही तरतूद रेल्वे बोर्डाकडे नाही, असंही कॅगने अहवालात म्हंटलं.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे