शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

48 गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देत रेल्वेने केली तिकीटाच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 13:36 IST

भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे.परफास्ट ट्रेनमधून प्रवास करताना आता प्रवाशांना 30 ते 75 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करताना आता प्रवाशांना 30 ते 75 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. या 48 गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केल्याने 70 कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे. रेल्वेने 48 गाड्यांचा समावेश सुपरफास्ट प्रकारात केल्याने आता सुपरफास्ट गाड्यांची एकूण संख्या 1 हजार 72 झाली आहे.

रेल्वेने ज्या 48 गाड्यांच्या तिकीटाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. त्या गाड्यांमधील स्लिपर कोचचं तिकीट 30 रुपयांनी, सेकंड आणि थर्ड एसीचं तिकीट 45 रुपयांनी आणि फर्स्ट एसीचं तिकीट 75 रुपयांनी वाढवलं गेलं आहे. त्यामुळे पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-चंदिगढ एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-नांदेड एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस, कानपूर-उधमपूर एक्स्प्रेस, छपरा-मथुरा एक्स्प्रेस, रॉक फोर्ट चेन्नई-तिरुचिलापल्ली एक्स्प्रेस, बंगळुरु-शिवमोगा एक्स्प्रेस, टाटा-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, दरभंगा-जालंधर एक्स्प्रेस, मुंबई-मधुरा एक्स्प्रेस आणि मुंबई-पाटणा एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जादा पैसै मोजावे लागणार आहेत. 

 रेल्वेने ज्या गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन अतिरिक्त तिकीट दर लागू केले आहेत, त्यांच्या वेगात फार मोठा फरक पडलेला नाही. या गाड्यांचा वेग फक्त 5 किलोमीटर प्रतितास इतका वाढला आहे. त्यामुळे आधी 50 किलोमीटर प्रतिसास वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या आता 55 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतील. पण रेल्वेच्या वेगामध्ये झालेली ही वाढ सोडली तर रेल्वेकडून इतर कोणत्याही नव्या सेवा देण्यात आलेल्या किंवा रेल्वेत नव्या सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय रेल्वेचा वेग वाढल्यावरही त्या वेळेवर धावतील, याची कोणतीही खात्री नाही. उत्तर भारतात हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे बऱ्याच रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. याला राजधानी, दुरान्तो, शताब्दी यांच्यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

कॅगच्या गेल्या रिपोर्टमध्ये रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढेले होते. प्रवाशांकडून सुपरफास्ट चार्ज वसूल केला जातो पण ट्रेन सुपरफास्ट जात नाहीत तसंच तेथे इतर सुविधाही दिल्या जात नाहीत, असं कॅगने अहवालात म्हंटलं होतं. रेल्वे प्रवासात प्रवाशांना योग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर सुपरफास्ट चार्ज परत करण्याची कुठलीही तरतूद रेल्वे बोर्डाकडे नाही, असंही कॅगने अहवालात म्हंटलं.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे