शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन्सची व्यवस्था जाणार खासगी कंपन्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:50 IST

रेल्वे मंत्रालय यापुढच्या काळात फक्त रेल्वेगाड्या चालवण्याचेच काम करील आणि रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपविली जाईल. पहिल्या टप्प्यात हे काम देशातील ४०० रेल्वेस्टेशन्सवर केले जाईल असा प्रस्ताव आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - रेल्वे मंत्रालय यापुढच्या काळात फक्त रेल्वेगाड्या चालवण्याचेच काम करील आणि रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपविली जाईल. पहिल्या टप्प्यात हे काम देशातील ४०० रेल्वेस्टेशन्सवर केले जाईल असा प्रस्ताव आहे.रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, स्टेशन्सच्या पुनर्विकासासाठी आरएलडीएच्या काही नियमांत शिथिलता आणण्यासोबत कराराला आकर्षक बनवण्यासाठीही अधिकार दिले जात आहेत. हे नियम जानेवारी -फेब्रुवारी किंवा नजिकच्या काळात पूर्णपणे लागू करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे कामे लवकर सुरू होतील.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आदेश आहेत की प्रवाशांना स्टेशनवर जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि विश्रांती मिळायला हवी व याच कारणामुळे आरएलडीएच्या नियमांत शिथिलता दिली जात आहे. त्यांनी सांगितले की आरएलडीएचे व्यवस्थापकीय संचालक हे व्यावसायिक व्यक्ती असून सरकारची योजना यशस्वी करण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतील.रेल्वेचे मुख्य कार्य आहे रेल्वेगाड्या चालवण्याचे व ते काम त्याने पूर्ण दक्षतेने केले पाहिजे. रेल्वे स्टेशन्स चालवण्याची व्यवस्था खासगी लोकांकडे सोपवावी. यासाठी व्यवस्थापन करार मॉडेल वापरले जात आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्टेशन्सवर मिळणाºया सुविधा खासगी कंपनी उपलब्ध करून देईल व ती स्टेशन्सच्या पायाभूत सुविधांचीही देखरेख करील. यासाठीचा खर्च प्रवाशांवर टाकला जाणार नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, अ‍ॅसेट मॅनेजमेंटमध्ये किती तरी आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर देशातील अनेक नामवंत पायाभूत आधार व्यवस्थापन कंपन्यांही यासाठी उत्सुक आहेत. आमची त्यांच्याशी वेगवेगळ््या मुद्यांवर चर्चा सुरू आहे. या खासगी कंपन्या आल्यानंतर वेगवेगळ््या कार्यातून व जबाबदाºयांतून मोकळे होणारे कर्मचारी रेल्वे संचालनाच्या कार्यात सामावून घेतले जातील.असे होतील बदलखासगी कंपन्यांसाठी प्रस्तावित नियमांत ९९ वर्षांचा कालावधी करण्याचा विचार आहे. स्टेशन्सवर खासगी कंपनीला करार केल्यानंतर उप करार करण्याची परवागनी दिली जाईल.खासगी कंपनी हे सांगेल की तिला वर्षभर प्रवाशांना व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किती निधी लागेल.याशिवाय स्टेशन्सवर लावल्या जाणाºया जाहिराती, फूड स्टॉल्स व इतर पर्यायी स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न संबंधित एजन्सीलाच दिले जाईल.गरजेनुसार रेल्वे स्टेशन्सवर वॉटर व्हेंडींग किंवा फूड व्हेंडींग मशीन उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव आहे. यातून मिळणारा पैसाही खासगी कंपनीचे उत्पन्न असेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत