शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये रेल्वे क्रांती! दिल्लीहून थेट श्रीनगरला पोहोचणार ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून थेट श्रीनगरला जाणाऱ्या रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत.

काश्मीरला सर्व शहरांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम सुरू आहे. आता नवीन वर्षात देशाला मोठी भेट मिळणार आहे. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीत सुरू होणार आहे. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या लक्झरी गाड्याही चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीरेल्वेने प्रवास करणार आहेत. याबाबत उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय यांनी माहिती दिली.

मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले, 'कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किलोमीटर लांबीच्या सेक्शनवर काम सुरू आहे. चाचणीचा भाग म्हणून या मार्गावर इंजिन आणि खडींनी भरलेली मालगाडी चालवली जात आहे. अंजी नदीवरही त्याचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम चाचणी उत्तर मंडळाच्या सुरक्षा आयुक्तांकडून १५ जानेवारीपूर्वी केव्हाही घेतली जाईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्लीहून श्रीनगरला येत वंदे भारतमध्ये प्रवास करू शकतात. उपाध्याय म्हणाले की, कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किमी लांबीच्या सेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू होती, ती पूर्ण झाली आहे. याशिवाय, येथे सर्वात कठीण गोष्ट म्हणजे T-33 बोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिटमध्ये काही कमतरता आढळून आल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा काश्मीर कोणत्याही प्रकल्पाद्वारे प्रत्येक हंगामात उर्वरित भारताशी जोडले जाईल. १७ किलोमीटरच्या रियासी कटरा सेक्शनमुळे हे घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम गुंतागुंतीचे असले तरी भारतीय रेल्वेने ते सिद्ध केले आहे. काश्मीरमधील लोकांसाठीही हा गेम चेंजर ठरेल, असे ते म्हणाले. दिल्लीहून थेट काश्मीरला पोहोचणे ही रेल्वेसाठी मोठी गोष्ट आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असेल. ते म्हणाले की, रेल्वेने काश्मीर गाठणे हे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. याशिवाय पुरवठा साखळीही बळकट होऊन महागाईपासून लोकांना दिलासा मिळणार आहे.

या रल्वेसेवेमुळे काश्मिरमध्ये पर्यटक वाढतील.  तिकीट दरही माफक असणार आहेत. ११८ किमी लांबीचा काझीगुंड बारामुल्ला २००९ मध्ये सुरू झाला होता. त्यानंतर जून २०१३ मध्ये बनिहाल काझीगुंड विभाग सुरू करण्यात आला. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये उधमपूर ते कटरा हा २५ किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बनिहाल आणि सांगलदान रेल्वे स्थानकांदरम्यान इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम २००५-०६ मध्ये सुरू झाले होते. 

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर