शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

काश्मीरमध्ये रेल्वे क्रांती! दिल्लीहून थेट श्रीनगरला पोहोचणार ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून थेट श्रीनगरला जाणाऱ्या रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत.

काश्मीरला सर्व शहरांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम सुरू आहे. आता नवीन वर्षात देशाला मोठी भेट मिळणार आहे. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीत सुरू होणार आहे. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या लक्झरी गाड्याही चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीरेल्वेने प्रवास करणार आहेत. याबाबत उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय यांनी माहिती दिली.

मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले, 'कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किलोमीटर लांबीच्या सेक्शनवर काम सुरू आहे. चाचणीचा भाग म्हणून या मार्गावर इंजिन आणि खडींनी भरलेली मालगाडी चालवली जात आहे. अंजी नदीवरही त्याचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम चाचणी उत्तर मंडळाच्या सुरक्षा आयुक्तांकडून १५ जानेवारीपूर्वी केव्हाही घेतली जाईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्लीहून श्रीनगरला येत वंदे भारतमध्ये प्रवास करू शकतात. उपाध्याय म्हणाले की, कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किमी लांबीच्या सेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू होती, ती पूर्ण झाली आहे. याशिवाय, येथे सर्वात कठीण गोष्ट म्हणजे T-33 बोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिटमध्ये काही कमतरता आढळून आल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा काश्मीर कोणत्याही प्रकल्पाद्वारे प्रत्येक हंगामात उर्वरित भारताशी जोडले जाईल. १७ किलोमीटरच्या रियासी कटरा सेक्शनमुळे हे घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम गुंतागुंतीचे असले तरी भारतीय रेल्वेने ते सिद्ध केले आहे. काश्मीरमधील लोकांसाठीही हा गेम चेंजर ठरेल, असे ते म्हणाले. दिल्लीहून थेट काश्मीरला पोहोचणे ही रेल्वेसाठी मोठी गोष्ट आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असेल. ते म्हणाले की, रेल्वेने काश्मीर गाठणे हे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. याशिवाय पुरवठा साखळीही बळकट होऊन महागाईपासून लोकांना दिलासा मिळणार आहे.

या रल्वेसेवेमुळे काश्मिरमध्ये पर्यटक वाढतील.  तिकीट दरही माफक असणार आहेत. ११८ किमी लांबीचा काझीगुंड बारामुल्ला २००९ मध्ये सुरू झाला होता. त्यानंतर जून २०१३ मध्ये बनिहाल काझीगुंड विभाग सुरू करण्यात आला. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये उधमपूर ते कटरा हा २५ किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बनिहाल आणि सांगलदान रेल्वे स्थानकांदरम्यान इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम २००५-०६ मध्ये सुरू झाले होते. 

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर