शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 17:33 IST

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

नवी दिल्ली - रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे पुढच्या केवळ पाचच दिवसांत रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट देणार आहेत. खुद्द रेल्वेचे सीईओ व्ही. के. यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "प्रवाशांना रेल्वे तिकिट बूक करणे आणखी सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई तिकिटींग वेबसाईट नवीन सुविधांसह अपग्रेड केली जात आहे. यासाठीची आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांतच यासंदर्भात माहिती देणार आहेत. यादव शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता अधिकांश लोक प्लॅटफॉर्म काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे IRCTC वेबसाईट आणखी चांगली बनवणे आवश्यक आहे.

रेल्वेने नुकतेच बदलले आहेत तिकिट बुकिंगचे 'हे' नियम- भारतीय रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्याच्या नियमांत नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे. हा नंबर जी व्यक्ती प्रवास करत आहे तिचा असणे आवश्यक आहे.

- ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना रजिस्टर्ड कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणे आवश्यक आहे. मग तिकिट बुकिंग कुणीही केलेली असो. 

- रेल्वेने म्हटले आहे, की अधिकांश प्रवासी दुसऱ्याच्या अकाउंटवरून बुकिंग करून प्रवास करतात. अनेक जण एजन्सीच्या मदतीनेही तिकिट बुक करतात. यामुळे प्रवाशांचा फोन नंबर PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.

- अशा स्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास अथवा ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती मिळत नाही. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहे. सध्या रेल्वे एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना यासंदर्भात माहिती देते.

- रेल्वेने म्हटले आहे, की सर्व प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांचा मोबाईल क्रमांकच नोंदवावा. यामुळे रेल्वेकडून मिळणारी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.

- याशिवाय रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारी माहितीही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे