शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 17:33 IST

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

नवी दिल्ली - रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे पुढच्या केवळ पाचच दिवसांत रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट देणार आहेत. खुद्द रेल्वेचे सीईओ व्ही. के. यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "प्रवाशांना रेल्वे तिकिट बूक करणे आणखी सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई तिकिटींग वेबसाईट नवीन सुविधांसह अपग्रेड केली जात आहे. यासाठीची आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांतच यासंदर्भात माहिती देणार आहेत. यादव शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता अधिकांश लोक प्लॅटफॉर्म काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे IRCTC वेबसाईट आणखी चांगली बनवणे आवश्यक आहे.

रेल्वेने नुकतेच बदलले आहेत तिकिट बुकिंगचे 'हे' नियम- भारतीय रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्याच्या नियमांत नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे. हा नंबर जी व्यक्ती प्रवास करत आहे तिचा असणे आवश्यक आहे.

- ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना रजिस्टर्ड कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणे आवश्यक आहे. मग तिकिट बुकिंग कुणीही केलेली असो. 

- रेल्वेने म्हटले आहे, की अधिकांश प्रवासी दुसऱ्याच्या अकाउंटवरून बुकिंग करून प्रवास करतात. अनेक जण एजन्सीच्या मदतीनेही तिकिट बुक करतात. यामुळे प्रवाशांचा फोन नंबर PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.

- अशा स्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास अथवा ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती मिळत नाही. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहे. सध्या रेल्वे एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना यासंदर्भात माहिती देते.

- रेल्वेने म्हटले आहे, की सर्व प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांचा मोबाईल क्रमांकच नोंदवावा. यामुळे रेल्वेकडून मिळणारी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.

- याशिवाय रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारी माहितीही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे