शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 17:33 IST

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

नवी दिल्ली - रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे पुढच्या केवळ पाचच दिवसांत रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट देणार आहेत. खुद्द रेल्वेचे सीईओ व्ही. के. यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "प्रवाशांना रेल्वे तिकिट बूक करणे आणखी सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई तिकिटींग वेबसाईट नवीन सुविधांसह अपग्रेड केली जात आहे. यासाठीची आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांतच यासंदर्भात माहिती देणार आहेत. यादव शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता अधिकांश लोक प्लॅटफॉर्म काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे IRCTC वेबसाईट आणखी चांगली बनवणे आवश्यक आहे.

रेल्वेने नुकतेच बदलले आहेत तिकिट बुकिंगचे 'हे' नियम- भारतीय रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्याच्या नियमांत नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे. हा नंबर जी व्यक्ती प्रवास करत आहे तिचा असणे आवश्यक आहे.

- ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना रजिस्टर्ड कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणे आवश्यक आहे. मग तिकिट बुकिंग कुणीही केलेली असो. 

- रेल्वेने म्हटले आहे, की अधिकांश प्रवासी दुसऱ्याच्या अकाउंटवरून बुकिंग करून प्रवास करतात. अनेक जण एजन्सीच्या मदतीनेही तिकिट बुक करतात. यामुळे प्रवाशांचा फोन नंबर PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.

- अशा स्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास अथवा ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती मिळत नाही. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहे. सध्या रेल्वे एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना यासंदर्भात माहिती देते.

- रेल्वेने म्हटले आहे, की सर्व प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांचा मोबाईल क्रमांकच नोंदवावा. यामुळे रेल्वेकडून मिळणारी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.

- याशिवाय रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारी माहितीही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे