शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 17:33 IST

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

नवी दिल्ली - रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे पुढच्या केवळ पाचच दिवसांत रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट देणार आहेत. खुद्द रेल्वेचे सीईओ व्ही. के. यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "प्रवाशांना रेल्वे तिकिट बूक करणे आणखी सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई तिकिटींग वेबसाईट नवीन सुविधांसह अपग्रेड केली जात आहे. यासाठीची आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांतच यासंदर्भात माहिती देणार आहेत. यादव शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता अधिकांश लोक प्लॅटफॉर्म काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे IRCTC वेबसाईट आणखी चांगली बनवणे आवश्यक आहे.

रेल्वेने नुकतेच बदलले आहेत तिकिट बुकिंगचे 'हे' नियम- भारतीय रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्याच्या नियमांत नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे. हा नंबर जी व्यक्ती प्रवास करत आहे तिचा असणे आवश्यक आहे.

- ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना रजिस्टर्ड कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणे आवश्यक आहे. मग तिकिट बुकिंग कुणीही केलेली असो. 

- रेल्वेने म्हटले आहे, की अधिकांश प्रवासी दुसऱ्याच्या अकाउंटवरून बुकिंग करून प्रवास करतात. अनेक जण एजन्सीच्या मदतीनेही तिकिट बुक करतात. यामुळे प्रवाशांचा फोन नंबर PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.

- अशा स्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास अथवा ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती मिळत नाही. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहे. सध्या रेल्वे एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना यासंदर्भात माहिती देते.

- रेल्वेने म्हटले आहे, की सर्व प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांचा मोबाईल क्रमांकच नोंदवावा. यामुळे रेल्वेकडून मिळणारी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.

- याशिवाय रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारी माहितीही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे