शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 17:02 IST

Indian Railways: अश्विनी वैष्णव यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

भुवनेश्वर: कोरोनाच्या कालावधीनंतर भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवा पुन्हा सुरू केली आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला. केंद्रात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी रेल्वे मंत्रालयात खांदेपालट करून पीयूष गोयल यांच्याऐवजी अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्री करण्यात आले. यानंतर रेल्वेमंत्री यांनी धडाक्यात कामाला सुरुवात केली. यानंतर प्रवाशांना भारतीय रेल्वेबाबत काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव थेट ट्रेनमध्ये पोहोचले. (railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene)

“सध्या मी दिवसातून एकदाच जेवतो”; PM मोदींनीच केला यामागील खुलासा

भारतीय रेल्वेच्या सेवांबद्दल प्रवाशांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी गप्पा मारल्या आणि रेल्वे सेवांबद्दल फीडबॅक घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे आणि देशातील विकासाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दलही सांगितले. वैष्णव हे भुवनेश्वर येथे जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी होतो का

भुवनेश्वरहून रायगडाच्या दिशेने रात्रभर प्रवास करताना त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि रेल्वेबद्दल प्रवाशांचे मत काय तसेच स्वच्छतेबद्दल त्यांचे फीडबॅक जाणून घेतले. प्रवाशांशी संवाद साधताना, ट्रेनमधील सुविधांबाबत विचारले. प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी होतो का, असेही विचारले. तसेच रेल्वेत स्वच्छ भारत अभियानच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याबद्दल प्रश्न विचारले. तसेच रेल्वेतील तरुणांशी संवाद साधून नवीन भारताविषयीचा त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय रेल्वेने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना भेटून मला खूप आनंद झाला. ते खूप चांगले आणि मनमिळावू व्यक्ती आहेत. ते तरुणांना प्रोत्साहन देतात, अशी प्रतिक्रिया एका महिला प्रवाशाने दिली. ही एक पूर्णपणे वेगळी भावना आहे. तुम्ही एखाद्या मिशनवर असताना भारताची लाइफलाइन असलेल्या रेल्वेत प्रवास करणे हा अनूभव वेगळाच आहे. हा प्रवास आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. रेल्वेमंत्री म्हणून मी स्वतः हा फिडबॅक घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेतील सोई-सुविधा सुधारल्या आहेत, याचे प्रवाशांनी कौतुक केले आहे. रेल्वे आधीपेक्षा जास्त स्वच्छ असतात, त्यामुळे प्रवास करण्याचा आनंद द्विगुणीत होतो, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवbhubaneswar-pcभुवनेश्वरOdishaओदिशा