शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आता कन्फर्म तत्काळ तिकीट मिळणार? रेल्वे करणार नियमात बदल; प्रवाशांचा होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:15 IST

Indian Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या अखेरीस नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

Indian Railway Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे, दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालले आहे. भारतीय रेल्वेकडून यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असतात. भारतीय प्रवासी रेल्वे ट्रेनची सेवाही वाढवली जाते. परंतु, काही मार्ग असे आहेत, ते अत्यंत व्यस्त असतात आणि तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. तत्काळ तिकीट काढणे आणि ते तिकीट कन्फर्म मिळणे अधिक जिकरीचे होत चालले आहे. यावर समस्येवर भारतीय रेल्वेने रामबाण उतारा शोधून काढला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

तिकीट कन्फर्म मिळण्याच्या संदर्भात भारतीय रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे एक नवीन प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. ट्रेनची तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी लवकरच ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. यासाठी रेल्वे सिस्टिममध्ये तशी सुधारणा करणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेच्या नव्या सिस्टिमबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 

प्रवाशांचा होणार मोठा फायदा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी ई-आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करेल. ही प्रणाली रेल्वेच्या खऱ्या युझर्सना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यास मदत करेल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

नवीन तिकीट प्रणाली कसे काम करणार?

आयआरसीटीसीची वेबसाइटवर सध्या १३ कोटींहून अधिक सक्रिय युझर्स आहेत. परंतु यापैकी फक्त १० टक्के युझर्सनी आधार पडताळणी केली आहे. काही रिपोर्टनुसार, यासाठीच भारतीय रेल्वे नियम अधिक कडक करणार आहे. जेणेकरून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुलभ करता येऊ शकेल. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी युझर्सनाच ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी मिळेल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण आवश्यक असेल.

दरम्यान, तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरही आधार सत्यापन आधारित तत्काळ तिकीट बुकिंगची यंत्रणा राबवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआरसीटीसीने गेल्या एका वर्षात ३.५ कोटी बनावट युझर्सचे आयडी ब्लॉक केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवTravel Tipsट्रॅव्हल टिप्स