शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

आता कन्फर्म तत्काळ तिकीट मिळणार? रेल्वे करणार नियमात बदल; प्रवाशांचा होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:15 IST

Indian Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या अखेरीस नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

Indian Railway Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे, दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालले आहे. भारतीय रेल्वेकडून यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असतात. भारतीय प्रवासी रेल्वे ट्रेनची सेवाही वाढवली जाते. परंतु, काही मार्ग असे आहेत, ते अत्यंत व्यस्त असतात आणि तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. तत्काळ तिकीट काढणे आणि ते तिकीट कन्फर्म मिळणे अधिक जिकरीचे होत चालले आहे. यावर समस्येवर भारतीय रेल्वेने रामबाण उतारा शोधून काढला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

तिकीट कन्फर्म मिळण्याच्या संदर्भात भारतीय रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे एक नवीन प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. ट्रेनची तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी लवकरच ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. यासाठी रेल्वे सिस्टिममध्ये तशी सुधारणा करणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेच्या नव्या सिस्टिमबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 

प्रवाशांचा होणार मोठा फायदा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी ई-आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करेल. ही प्रणाली रेल्वेच्या खऱ्या युझर्सना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यास मदत करेल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

नवीन तिकीट प्रणाली कसे काम करणार?

आयआरसीटीसीची वेबसाइटवर सध्या १३ कोटींहून अधिक सक्रिय युझर्स आहेत. परंतु यापैकी फक्त १० टक्के युझर्सनी आधार पडताळणी केली आहे. काही रिपोर्टनुसार, यासाठीच भारतीय रेल्वे नियम अधिक कडक करणार आहे. जेणेकरून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुलभ करता येऊ शकेल. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी युझर्सनाच ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी मिळेल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण आवश्यक असेल.

दरम्यान, तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरही आधार सत्यापन आधारित तत्काळ तिकीट बुकिंगची यंत्रणा राबवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआरसीटीसीने गेल्या एका वर्षात ३.५ कोटी बनावट युझर्सचे आयडी ब्लॉक केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवTravel Tipsट्रॅव्हल टिप्स