शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

Railway Loss During Year 2021: रेल्वेने कोरोनाकाळात किती कमाई केली? आकडा पाहून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:51 IST

Railway Income During Year 2021: उंटीनीचे दूध असेल की कोरोना काळात मालवाहतूक सारे काही रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. याचवेळी प्रवासी सेवा देखील ठप्प होती.

कोरोना काळात देशभरात फक्त रेल्वेचाच देशाला आधार होता. उंटीनीचे दूध असेल की कोरोना काळात मालवाहतूक सारे काही रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. याचवेळी प्रवासी सेवा देखील ठप्प होती. काही काळाने रेल्वे वाहतूक सुरु करताना काही प्रोटोकॉल लागू करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे लोकांनी याकडे तशी पाठच फिरविली. आता जेव्हा रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत आहे, तेव्हा रेल्वेला किती कमाई झाली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. संसदेत यावर प्रश्न विचारण्यात आला होता. 

सरकारने या प्रश्नावर उत्तर दिले आहे. भारतीय रेल्वेला गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे. म्हणजेच महसूलात मोठी घट झाली आहे. तसेच रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये काही कपात केली आहे का, यावर देखील उत्तर दिले आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, 2019-20 मध्ये रेल्वेला झालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत 2020-21 मध्ये एकूण 34,145 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने प्रवासी आणि अन्य कोचिंग महसूलामध्ये झाली आहे. 

2019-20 मध्ये प्रवासी वाहतुकीतून झालेल्या कमाईचा आकडा हा 50669.09 कोटी रुपये होता. तर 2021 मध्ये ही कमाई 15,248.49 एवढी झाली. याचा विचार करता रेल्वेला कोरोना काळात 35,420.60 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच कोचिंग महसुलातून 2019-20 मध्ये रेल्वेला 4640.79 कोटी रुपये मिळाले होते. तर 2021 मध्ये ही कमाई निम्म्याहून कमी म्हणजेच 2096.76 कोटी रुपये झाली आहे. रेल्वेला यात 2544.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मालवातुकीत फायदा2019-20 मध्ये रेल्वेला माल वाहतुकीतून 113487.89 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले. तर 2021 मध्ये फायदा झाला आहे. रेल्वेला यंदा 117231.82 कोटी रुपयांची कमाई झाली. म्हणजे 3743.93 कोटी रुपयांचा फायदा झाला. तर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही भत्त्यामध्ये कपात करण्यात आली नाही, असे उत्तर सरकारने दिला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे