शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Railway Kavach Technique: 160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 15:58 IST

Railway Kavach anti collide test: रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. परदेशात या तंत्रज्ञानासाठी प्रती किमीला २ कोटी रुपये खर्च येतो. रेल्वेने ते ५० लाखांत विकसित केले आहे.

भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप ऐतिहासिक होता. रेल्वेने कवच तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची आज चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. यासाठी १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन ट्रेन एकमेकांच्या दिशेने येत होत्या. एका ट्रेनच्या इंजिनामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. या ट्रेन एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या आणि सर्वांना हायसे वाटले. 

रेल्वे मंत्र्यांनी याचे व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनतनगर-शंकरपल्ली विभागामध्ये ही चाचणी घेण्यात आली. 

कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. 

जेव्हा ट्रेन अशा सिग्नलवरून जाते, जिथे तिला जाण्याची परवानगी नसते, तेव्हा त्यातून धोक्याचा सिग्नल पाठविला जातो. जर लोको पायलट ट्रेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर 'कवच' तंत्रज्ञानाद्वारे ट्रेनचे ब्रेक आपोआप लागू होतात आणि ट्रेन कोणत्याही अपघातापासून वाचते. अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच, ते SIL-4 (सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4) शी सुसंगत आहे, जे सुरक्षा तंत्राचा सर्वोच्च स्तर आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या बजेटमध्ये या कवच यंत्रणेची घोषणा करण्यात आली होती. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव