शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या ‘रेल रोको’ला संमिश्र प्रतिसाद; दीडशे ठिकाणी निदर्शने; अनेक रेल्वेंची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:34 IST

पोलीस - आंदोलकांत झाली झटापट

- विकास झाडेनवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटवावे व त्यांना अटक करावी या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या रेल रोको आंदोलनाला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरात सुमारे दीडशे ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रेल रोको आंदोलन व निदर्शने केली. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. या आंदोलनामुळे राजस्थान, हरियाणा येथे १८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या अंगावर वाहने घातल्याचा आरोप आहे. त्यावेळी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला अटक करण्यात आली आहे. पण, शेतकरी त्यावर समाधानी नाहीत. संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत रेल रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी एक्स्प्रेस रोखून धरल्याउत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात गड स्थानकाजवळ रेल्वे रोखून धरणारे आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. हकीमपूर, मुरादाबाद आदी ठिकाणीही शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्या रोखून धरल्या होत्या. आंदोलक शेतकऱ्यांनी बिलासपूर रेल्वे स्थानकावर जम्मू तावी-काठगोदाम एक्स्प्रेस तर, बुलंदशहरमधील खुर्जा जंक्शनवर गोमती एक्स्प्रेस रोखून धरली होती. अजय मिश्रा यांना अटक करा; मागणी कायमअजय मिश्रा यांना मंत्री पदावरून हटवा व त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे. ती केंद्र सरकार मान्य करत नसल्याने संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी देशव्यापी रेल रोको आंदोलन केले. यापुढेही ही मागणी सातत्याने करणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी कायद्यांविरुद्ध निघणार मध्य प्रदेशमधून यात्रानवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या वर्षी केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन पंजाब, हरयाणा आणि दिल्लीतून शेजारच्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्येही पसरले आहे. सध्या त्याचे स्वरूप लहान आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने भोपाळजवळील होशंगाबाद येथून ९ हजार किलोमीटर मोर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे.शेतकऱ्यांसाठी बरेच काही केले आहे, अशी मध्य प्रदेशची प्रतिमा असली, तरी पेरणीचा हंगाम सुरू झाल्यावर निर्माण झालेल्या खतटंचाईवरून शेतकरी नाराज आहेत.