शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:54 IST

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते.

नवी दिल्ली : कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी गट आणि अमलीपदार्थ तस्कर यांच्यातील संबंधांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ राज्यांमध्ये ७२ ठिकाणी धाडी टाकल्या. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात छापेमारी सुरू आहे. 

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते. एका प्रकरणात त्याचे नावही आहे. भारतात आणि विदेशात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांकडून पैसे जमा करणे, दिल्ली आणि देशाच्या अन्य भागांतून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे आणि प्रतिष्ठित लोकांची हत्या करणे आदी प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतलेला आहे. यापूर्वीही एनआयएने एकाचवेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. 

एफसीआय भ्रष्टाचार : सीबीआयच्याही धाडी         व्यापारी आणि तांदूळ मिलमालक यांच्या फायद्यासाठी निकृष्ट धान्य खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्यांविरुद्ध मंगळवारी सीबीआयने मोठी कारवाई केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून सीबीआयने पंजाबमधील ३० ठिकाणी धाडी टाकल्या. 

सीबीआयच्या पथकांनी ‘ऑपरेशन कनक २’चा भाग म्हणून धान्य व्यापारी, तांदूळ मिलमालक आणि एफसीआयचे सेवानिवृत्त आणि सेवेतील अधिकारी यांच्या जागेवर छापे टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई राजपुरा, सरहिंद, पटियाला, फतेहगढ साहिब, मोहाली, मोगा, फिरोजपूर, लुधियाना, संगरूर आदी भागात करण्यात आली. एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या आहेत. खासगी मिलमालकांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्यावर पडदा टाकत अधिकाऱ्यांच्या या समूहाने गुदामात उतरविण्यात आलेल्या प्रतिट्रकवर १००० ते ४००० रुपये लाच घेतली असा ठपका आहे. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत वितरित केली.   

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा