शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:54 IST

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते.

नवी दिल्ली : कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी गट आणि अमलीपदार्थ तस्कर यांच्यातील संबंधांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ राज्यांमध्ये ७२ ठिकाणी धाडी टाकल्या. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात छापेमारी सुरू आहे. 

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते. एका प्रकरणात त्याचे नावही आहे. भारतात आणि विदेशात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांकडून पैसे जमा करणे, दिल्ली आणि देशाच्या अन्य भागांतून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे आणि प्रतिष्ठित लोकांची हत्या करणे आदी प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतलेला आहे. यापूर्वीही एनआयएने एकाचवेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. 

एफसीआय भ्रष्टाचार : सीबीआयच्याही धाडी         व्यापारी आणि तांदूळ मिलमालक यांच्या फायद्यासाठी निकृष्ट धान्य खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्यांविरुद्ध मंगळवारी सीबीआयने मोठी कारवाई केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून सीबीआयने पंजाबमधील ३० ठिकाणी धाडी टाकल्या. 

सीबीआयच्या पथकांनी ‘ऑपरेशन कनक २’चा भाग म्हणून धान्य व्यापारी, तांदूळ मिलमालक आणि एफसीआयचे सेवानिवृत्त आणि सेवेतील अधिकारी यांच्या जागेवर छापे टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई राजपुरा, सरहिंद, पटियाला, फतेहगढ साहिब, मोहाली, मोगा, फिरोजपूर, लुधियाना, संगरूर आदी भागात करण्यात आली. एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या आहेत. खासगी मिलमालकांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्यावर पडदा टाकत अधिकाऱ्यांच्या या समूहाने गुदामात उतरविण्यात आलेल्या प्रतिट्रकवर १००० ते ४००० रुपये लाच घेतली असा ठपका आहे. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत वितरित केली.   

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा