शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे देशात आली टॅक्स दहशतवादाची त्सुनामी, राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 21:05 IST

नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे.

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी पीएचडी चेंबर्स ऑफ काँमर्सच्या वार्षिक महोत्सवाला संबोधित करताना नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. आता येत्या 8 नोव्हेंबरला 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणले,"देशातील व्यवसाय बुडत आहेत. पण जेटली देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सारे काही आलबेल असल्याचे टीव्हीसमोर येऊन सांगतात. मोदी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला केला आहे. सुरुवातील नोटाबंदी आणि नंतर जीएसटी या दोघांमुळे आमची अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. सरकारने ज्यापद्धतीने जीएसटी लागू केली आहे. त्यामुळे देशात करदहशतवाद आला आहे. तसेच यानंतर परिस्थिती अधिकच वाईट होणार आहे."   मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "व्यवसाय हा विश्वासावर चालतो. पण या सरकारवरील विश्वास उडाला आहे. पंतप्रधान आणि सरकारला प्रत्येक व्यक्ती ही चोर आहे, असे वाटते. सगळाच पैसा काळा असू शकत नाही. पंतप्रधानांनी आपल्या अधिकारांचा उपयोग मोठी छाती आणि छोट्या हृदयाने केला आहे."   "मोदी सरकारमध्ये सर्वसामान्यांची ऐकणारा कुणी नाही. विश्वास एकमेकांना विकसित करतो. सरकारने जनतेचे ऐकणे, जनतेवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. स्टार्टअप इंडियासोबत शटअप इंडिया नाही चालू शकत," असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.   काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गुरुवारी सकाळी निशाणा साधला होता. 'नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे आणि तुमच्या औषधातही काही जोर नाहीय', असे ट्विट राहुल गांधी यांनी  केले होते. सलग तीन वर्ष  भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते. यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती.दरम्यान, पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी 9 लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. यात बुडित व थकित कर्जांखाली दबलेल्या सरकारी बँकांना भांडवलपूर्तीसाठी 2 लाख 11 हजार कोटी देण्याचा व ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेसह अन्य महामार्ग व रस्ते बांधणीसाठी तब्बल सात लाख कोटी रुपये खर्च करण्याचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या खात्याच्या वित्त, वित्तीय सेवा, महसूल या तिन्ही विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांना सोबत घेऊन, देशाची अर्थव्यवस्थेला ठराविक क्षेत्रांत थोडासा टेकू दिला, तर ती पुन्हा जलद विकासाच्या दिशेने धाव घेण्यास सक्षम आहे, असा दावा केला. दरम्यान, या घोषणांचा निवडणुकांशी काहीही घेणं-देणं नाही,असेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले.  ज्यांनी देश उद्ध्वस्त केलाय, आता ते प्रवचनच देणार असे सांगत जेटलींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGSTजीएसटीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी