शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जीएसटीमुळे देशात आली टॅक्स दहशतवादाची त्सुनामी, राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 21:05 IST

नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे.

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी पीएचडी चेंबर्स ऑफ काँमर्सच्या वार्षिक महोत्सवाला संबोधित करताना नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. आता येत्या 8 नोव्हेंबरला 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणले,"देशातील व्यवसाय बुडत आहेत. पण जेटली देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सारे काही आलबेल असल्याचे टीव्हीसमोर येऊन सांगतात. मोदी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला केला आहे. सुरुवातील नोटाबंदी आणि नंतर जीएसटी या दोघांमुळे आमची अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. सरकारने ज्यापद्धतीने जीएसटी लागू केली आहे. त्यामुळे देशात करदहशतवाद आला आहे. तसेच यानंतर परिस्थिती अधिकच वाईट होणार आहे."   मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "व्यवसाय हा विश्वासावर चालतो. पण या सरकारवरील विश्वास उडाला आहे. पंतप्रधान आणि सरकारला प्रत्येक व्यक्ती ही चोर आहे, असे वाटते. सगळाच पैसा काळा असू शकत नाही. पंतप्रधानांनी आपल्या अधिकारांचा उपयोग मोठी छाती आणि छोट्या हृदयाने केला आहे."   "मोदी सरकारमध्ये सर्वसामान्यांची ऐकणारा कुणी नाही. विश्वास एकमेकांना विकसित करतो. सरकारने जनतेचे ऐकणे, जनतेवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. स्टार्टअप इंडियासोबत शटअप इंडिया नाही चालू शकत," असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.   काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गुरुवारी सकाळी निशाणा साधला होता. 'नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे आणि तुमच्या औषधातही काही जोर नाहीय', असे ट्विट राहुल गांधी यांनी  केले होते. सलग तीन वर्ष  भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते. यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती.दरम्यान, पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी 9 लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. यात बुडित व थकित कर्जांखाली दबलेल्या सरकारी बँकांना भांडवलपूर्तीसाठी 2 लाख 11 हजार कोटी देण्याचा व ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेसह अन्य महामार्ग व रस्ते बांधणीसाठी तब्बल सात लाख कोटी रुपये खर्च करण्याचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या खात्याच्या वित्त, वित्तीय सेवा, महसूल या तिन्ही विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांना सोबत घेऊन, देशाची अर्थव्यवस्थेला ठराविक क्षेत्रांत थोडासा टेकू दिला, तर ती पुन्हा जलद विकासाच्या दिशेने धाव घेण्यास सक्षम आहे, असा दावा केला. दरम्यान, या घोषणांचा निवडणुकांशी काहीही घेणं-देणं नाही,असेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले.  ज्यांनी देश उद्ध्वस्त केलाय, आता ते प्रवचनच देणार असे सांगत जेटलींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGSTजीएसटीIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी