शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अमेठीत मोदींनी खोटारडेपणा केल्याचा राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:20 IST

अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता

नवी दिल्ली : अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता आणि तिथे अनेक वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन होत आहे, पण हा प्रकल्प जणू काही आपणच आणला या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी भारत व रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने अमेठीतील कोरवा येथे बांधण्यात येणाऱ्या कारखान्यासह ५३८ कोटी रुपये खर्चाच्या १७ योजनांचा पायाभरणी तसेच लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेठीतील आॅर्डिनन्स फॅक्टरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठीमध्ये जाऊन पुन्हा खोटे बोलले. सतत खोटारडेपणा करण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का. असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.अमेठी येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीकडे राहुल गांधी यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. या कारखान्यात बनणाऱ्या एके-२०३ रायफली आता ‘मेड इन अमेठी' म्हणून ओळखल्या जातील असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावर राहुल गांधी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राहुल घाबरले- स्मृती इराणीराहुल गांधी यांच्या टष्ट्वीटवर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे राहुल गांधी घाबरले आहेत. रायफलींच्या उत्पादनांसाठी अमेठीत उभारला जाणाºया कारखान्याचा प्रकल्प त्यांनी नजरेआड केला होता.>२०0७ : राहुल गांधी यांनी अमेठीत आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले होते. तेथे काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे.>२०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत जाऊन रविवारी पुन्हा आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९