शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अमेठीत मोदींनी खोटारडेपणा केल्याचा राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:20 IST

अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता

नवी दिल्ली : अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता आणि तिथे अनेक वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन होत आहे, पण हा प्रकल्प जणू काही आपणच आणला या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी भारत व रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने अमेठीतील कोरवा येथे बांधण्यात येणाऱ्या कारखान्यासह ५३८ कोटी रुपये खर्चाच्या १७ योजनांचा पायाभरणी तसेच लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेठीतील आॅर्डिनन्स फॅक्टरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठीमध्ये जाऊन पुन्हा खोटे बोलले. सतत खोटारडेपणा करण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का. असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.अमेठी येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीकडे राहुल गांधी यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. या कारखान्यात बनणाऱ्या एके-२०३ रायफली आता ‘मेड इन अमेठी' म्हणून ओळखल्या जातील असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावर राहुल गांधी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राहुल घाबरले- स्मृती इराणीराहुल गांधी यांच्या टष्ट्वीटवर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे राहुल गांधी घाबरले आहेत. रायफलींच्या उत्पादनांसाठी अमेठीत उभारला जाणाºया कारखान्याचा प्रकल्प त्यांनी नजरेआड केला होता.>२०0७ : राहुल गांधी यांनी अमेठीत आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले होते. तेथे काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे.>२०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत जाऊन रविवारी पुन्हा आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९