शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 20:19 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छिमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक तामिळ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले असून श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार पकडल्या जाणाऱ्या तामिळ मच्छिमारांची सुटका करण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. तसेच, २१ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ३७ तमिळ मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. मायलादुथुराई येथील काँग्रेस खासदार आर सुधा यांनी मला या प्रकरणाची माहिती दिली, असे राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे.

अटक करण्यात आलेले मच्छिमार हे किनाऱ्याजवळ छोट्या प्रमाणात काम करतात. घटनेच्या दिवशी त्यांनी संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या बोटीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मच्छिमारांनी बचाव मदतीसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना अटक केली. जप्त केलेल्या मासेमारी नौका सामूहिक संसाधनातून खरेदी करण्यात आल्या होत्या, असेही राहुल गांधींनी पत्रात लिहिले आहे.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून लहान आणि सीमांत भारतीय मच्छिमारांना अटक करणे, मालमत्ता जप्त करणे आणि मोठा दंड ठोठावण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच, मी तुम्हाला विनंती करतो की, हे प्रकरण श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे मांडावे आणि मच्छिमार आणि त्यांच्या बोटींची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे.

एमके स्टॅलिन यांनीही परराष्ट्रमंत्र्यांना लिहिलं होतं पत्रतत्पूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, अलिकडच्या आठवड्यात तामिळनाडूतील मच्छिमारांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यासोबतच राज्यातील मच्छीमारांचे पारंपारिक हक्क अबाधित राखण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ठोस पावले उचलण्याची विनंती मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरSri Lankaश्रीलंकाTamilnaduतामिळनाडूfishermanमच्छीमारFishermanमच्छीमार