शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी एक वर्ष अध्यक्षपदापासून राहणार दूर ? करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:24 IST

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी बोलविण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाच्यावतीने राहुल यांचा राजीनामा एकमुखाने नाकारण्यात आला होता. त्यानंतरही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले असून त्यांनी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे.

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या. तसेच आपण पक्ष संघटनेचे काम करत राहणार असल्याचे म्हटले.

दरम्यान गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांना नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या दोन नेत्यांनी दक्षिण भारतातील नेत्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र कोणताही नेता राहुल असताना अध्यक्ष होण्यास तयार नाही. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील एखाद्या नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांच्या राजीनाम्यावर मधला मार्ग काढण्यात आला आहे. ज्यामुळे राहुल यांचा अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय कायम राहिल आणि पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल. न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी पदाशिवाय देशभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्ष संघटन मजबूत करतील. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी लवकरच काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.