शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राहुल गांधी महिन्याभरात निवडून येणार काँग्रेसच्या अध्यक्षपदी - वीरप्पा मोईली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:11 IST

काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देराहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केलीराहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेलसध्याच्या मोदी सरकारबाबत असलेला फुगा 2019 च्या निवडणुकांमध्ये फुटेल असा ठाम विश्वास मोईली यांनी व्यक्त केला

हैदराबाद, दि. 15 - काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षाने दिली तर आपण ही जबाबदारी पेलू असे वक्तव्य गांधी यांनी केले होते.

राहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केली. तसेच राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेल असेही मोईली म्हणाले. यामुळे काँग्रेसच नाही तर देशासाठीही हे शुभवर्तमान असेल ते म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रत्येकाची अशी भावना आहे की राहूल यांना अध्यक्ष करण्यास आधीच विलंब झालेला आहे. आता, राहूल हे पक्षाच्या निवडणुकांसाठी थांबले असून ही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरच राहूल ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडून येतील असे ते म्हणाले, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

राज्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया या महिन्यात संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर देशपातळीवरील निवडणुका घेण्यात येणार आहेत. आणि ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यामध्ये राहूल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असतील का यावर वीरप्पा मोईली यांनी होय असे उत्तर दिले आहे.

काँग्रेसला चांगले दिवस येण्यासाठी राहूल प्रयत्न करत असल्याचे मोईली यांनी सांगितले. भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असून त्या त्या राज्यातील स्थितीप्रमाणे प्रश्न हाताळायला लागतात असे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने राज्यांच्या निवडणुकांचे वेगवेगळे धोरण आखण्याची तसेच 2019 च्या निवडणुकांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

राज्यांमध्ये पदाधिकारी असलेल्यांमध्ये तातडीने बदल करण्याचे धोरण राहूल यांनी स्वीकारावे असे मत मोईली यांनी व्यक्त केले. तळापासून ते वरपर्यंत सगळ्या ठिकाणी संघटनात्मक बदल करण्याची गरज आहे असे मोईली म्हणाले. सध्याच्या रालोआच्या सरकारला सक्षम पर्याय म्हणून लोकांना काँग्रेस वाटेल इतका आमूलाग्र बदल करावा लागेल असे मोईली म्हणाले. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून काँग्रेसला बहुमत मिळेल यात काहीही शंका नाही असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाचं कर्नाटकात पुनरागमन होणं अशक्य असल्याचं ते म्हणाले.भाजपा सरकारनं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासन पाळली नसल्याचा आरोप मोईली यांनी केला आहे. अर्थव्यवस्था मंदावली असून निर्यातही घटल्याचे ते म्हणाले. रालोआ पूर्णपणे अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या मोदी सरकारबाबत असलेला फुगा 2019 च्या निवडणुकांमध्ये फुटेल असा ठाम विश्वास मोईली यांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा