शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राहुल गांधी महिन्याभरात निवडून येणार काँग्रेसच्या अध्यक्षपदी - वीरप्पा मोईली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:11 IST

काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देराहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केलीराहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेलसध्याच्या मोदी सरकारबाबत असलेला फुगा 2019 च्या निवडणुकांमध्ये फुटेल असा ठाम विश्वास मोईली यांनी व्यक्त केला

हैदराबाद, दि. 15 - काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षाने दिली तर आपण ही जबाबदारी पेलू असे वक्तव्य गांधी यांनी केले होते.

राहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केली. तसेच राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेल असेही मोईली म्हणाले. यामुळे काँग्रेसच नाही तर देशासाठीही हे शुभवर्तमान असेल ते म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रत्येकाची अशी भावना आहे की राहूल यांना अध्यक्ष करण्यास आधीच विलंब झालेला आहे. आता, राहूल हे पक्षाच्या निवडणुकांसाठी थांबले असून ही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरच राहूल ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडून येतील असे ते म्हणाले, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

राज्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया या महिन्यात संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर देशपातळीवरील निवडणुका घेण्यात येणार आहेत. आणि ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यामध्ये राहूल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असतील का यावर वीरप्पा मोईली यांनी होय असे उत्तर दिले आहे.

काँग्रेसला चांगले दिवस येण्यासाठी राहूल प्रयत्न करत असल्याचे मोईली यांनी सांगितले. भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असून त्या त्या राज्यातील स्थितीप्रमाणे प्रश्न हाताळायला लागतात असे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने राज्यांच्या निवडणुकांचे वेगवेगळे धोरण आखण्याची तसेच 2019 च्या निवडणुकांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

राज्यांमध्ये पदाधिकारी असलेल्यांमध्ये तातडीने बदल करण्याचे धोरण राहूल यांनी स्वीकारावे असे मत मोईली यांनी व्यक्त केले. तळापासून ते वरपर्यंत सगळ्या ठिकाणी संघटनात्मक बदल करण्याची गरज आहे असे मोईली म्हणाले. सध्याच्या रालोआच्या सरकारला सक्षम पर्याय म्हणून लोकांना काँग्रेस वाटेल इतका आमूलाग्र बदल करावा लागेल असे मोईली म्हणाले. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून काँग्रेसला बहुमत मिळेल यात काहीही शंका नाही असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाचं कर्नाटकात पुनरागमन होणं अशक्य असल्याचं ते म्हणाले.भाजपा सरकारनं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासन पाळली नसल्याचा आरोप मोईली यांनी केला आहे. अर्थव्यवस्था मंदावली असून निर्यातही घटल्याचे ते म्हणाले. रालोआ पूर्णपणे अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या मोदी सरकारबाबत असलेला फुगा 2019 च्या निवडणुकांमध्ये फुटेल असा ठाम विश्वास मोईली यांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा