शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Rahul Gandhi: कृषी कायदे पुन्हा आणलात तर...; कृषीमंत्र्यांच्या विधानावर राहुल गांधींनी दिला रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:29 IST

सरकार निराश झालेलं नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पण दोन पावलं पुढे जाऊ, असं सांगत तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली-

सरकार निराश झालेलं नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पण दोन पावलं पुढे जाऊ, असं सांगत तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे परत आणण्याच्या दिशेनं सरकारनं पावलं टाकली तर देशाचा अन्नदाता पुन्हा एकदा सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल आणि याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला आहे. पुन्हा पराभूत करू, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु 'सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ' असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले होते. अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तोमर यांच्या याच विधानाचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला आहे. 

"देशाच्या कृषीमंत्र्यांनी मोदींनी मागितलेल्या माफीचा अपमान केला असून हे अतिशय निंदनीय आहे. जर कृषी कायद्यांबाबत पुन्हा एकदा सरकारनं पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर अन्नदाता सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल. याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला होता आणि आम्ही पुन्हा एकदा पराभूत करू", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर