शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Rahul Gandhi: कृषी कायदे पुन्हा आणलात तर...; कृषीमंत्र्यांच्या विधानावर राहुल गांधींनी दिला रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:29 IST

सरकार निराश झालेलं नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पण दोन पावलं पुढे जाऊ, असं सांगत तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली-

सरकार निराश झालेलं नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पण दोन पावलं पुढे जाऊ, असं सांगत तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे परत आणण्याच्या दिशेनं सरकारनं पावलं टाकली तर देशाचा अन्नदाता पुन्हा एकदा सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल आणि याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला आहे. पुन्हा पराभूत करू, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु 'सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ' असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले होते. अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तोमर यांच्या याच विधानाचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला आहे. 

"देशाच्या कृषीमंत्र्यांनी मोदींनी मागितलेल्या माफीचा अपमान केला असून हे अतिशय निंदनीय आहे. जर कृषी कायद्यांबाबत पुन्हा एकदा सरकारनं पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर अन्नदाता सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल. याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला होता आणि आम्ही पुन्हा एकदा पराभूत करू", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर