शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राहुल गांधी यांनी विजय दर्डा यांना जे सांगितले, ते करून दाखविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:25 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.माजी खासदार विजय दर्डा यांनी अलीकडेच राहुल गांधी यांना एक पत्र लिहून काँग्रेस शासित राज्यांत बेरोजगार, शेतकरी आणि देशातील गरिबांना किमान उत्पन्न देण्याची तरतूद करण्याची सूचना केली होती. विजय दर्डा यांनी आपल्या पत्रासोबत काँग्रेस शासित राज्यांतील सुशिक्षित बेरोजगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांना किमान उत्पन्नाच्या हमीसाठी आवश्यक निधीची आकडेवारीही दिली होती. याबाबत लवकरात लवकर घोषणा होणे आवश्यक आहे, कारण मोदी सरकार अशाच स्वरूपाची घोषणा करण्यावर विचार करीत आहे, असेही दर्डा यांनी पत्रात नमूद केले होते.माजी खासदार विजय दर्डा यांच्या या पत्राची राहुल गांधी यांनी दखल घेऊन त्यांना तातडीने उत्त्तर पाठविले. त्यात राहुल यांनी म्हटले होते की, ‘बेरोजगार, अल्पभूधारक शेतकरी व गरिबांना किमान उत्पन्न मिळावे यासाठी आपण केलेली सूचना काँग्रेस निवडणूक जाहीरनामा समितीकडे पाठविण्यात आली आहे.’उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, माजी खासदार दर्डा यांच्या घोषणेवर राहुल गांधी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अर्थतज्ज्ञांशी गंभीर चर्चा केली. त्यानंतर छत्त्तीसगढमधील एका निवडणूक सभेत त्यांनी याबाबत पहिल्यांदा घोषणाही केली. राहुल गांधी यांनी घोषणा केली तेव्हा योजनेची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली नव्हती. त्यामुळे योजनेची विस्तृत माहिती सार्वजनिक होऊ शकली नव्हती.या आठवड्यात राहुल गांधी यांनी वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी असलेल्या सर्वच गरिबांना दरमहा किमान ६ हजार रुपये उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ शेतकरी असो वा विद्यार्थी अथवा व्यावसायिक सर्वच गरिबांना होणार आहे.आपल्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल माजी खासदार दर्डा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सूचनेचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचे जे वचन राहुल गांधी यांनी पत्राद्वारे दिले होते, ते पूर्णही केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक