शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राहुल गांधी यांनी विजय दर्डा यांना जे सांगितले, ते करून दाखविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:25 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.माजी खासदार विजय दर्डा यांनी अलीकडेच राहुल गांधी यांना एक पत्र लिहून काँग्रेस शासित राज्यांत बेरोजगार, शेतकरी आणि देशातील गरिबांना किमान उत्पन्न देण्याची तरतूद करण्याची सूचना केली होती. विजय दर्डा यांनी आपल्या पत्रासोबत काँग्रेस शासित राज्यांतील सुशिक्षित बेरोजगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांना किमान उत्पन्नाच्या हमीसाठी आवश्यक निधीची आकडेवारीही दिली होती. याबाबत लवकरात लवकर घोषणा होणे आवश्यक आहे, कारण मोदी सरकार अशाच स्वरूपाची घोषणा करण्यावर विचार करीत आहे, असेही दर्डा यांनी पत्रात नमूद केले होते.माजी खासदार विजय दर्डा यांच्या या पत्राची राहुल गांधी यांनी दखल घेऊन त्यांना तातडीने उत्त्तर पाठविले. त्यात राहुल यांनी म्हटले होते की, ‘बेरोजगार, अल्पभूधारक शेतकरी व गरिबांना किमान उत्पन्न मिळावे यासाठी आपण केलेली सूचना काँग्रेस निवडणूक जाहीरनामा समितीकडे पाठविण्यात आली आहे.’उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, माजी खासदार दर्डा यांच्या घोषणेवर राहुल गांधी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अर्थतज्ज्ञांशी गंभीर चर्चा केली. त्यानंतर छत्त्तीसगढमधील एका निवडणूक सभेत त्यांनी याबाबत पहिल्यांदा घोषणाही केली. राहुल गांधी यांनी घोषणा केली तेव्हा योजनेची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली नव्हती. त्यामुळे योजनेची विस्तृत माहिती सार्वजनिक होऊ शकली नव्हती.या आठवड्यात राहुल गांधी यांनी वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी असलेल्या सर्वच गरिबांना दरमहा किमान ६ हजार रुपये उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ शेतकरी असो वा विद्यार्थी अथवा व्यावसायिक सर्वच गरिबांना होणार आहे.आपल्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल माजी खासदार दर्डा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सूचनेचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचे जे वचन राहुल गांधी यांनी पत्राद्वारे दिले होते, ते पूर्णही केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक