शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:03 IST

काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचीभारत जोडो यात्रा यशस्वीपणे संपली आहे; परंतु, या यात्रेबद्दल सांगताना काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी खुलासा केला की, सुरुवातीला हे फार सोपे नव्हते, कारण यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केरळमध्ये यात्रा असताना राहुल गांधींना गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. वेदना इतकी तीव्र होती की राहुल गांधींनी त्यांच्याशिवाय प्रवास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.  

वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या गुडघेदुखीची माहिती मिळताच प्रियांका गांधी यांचाही फोन आला. इतर ज्येष्ठ नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपवण्याचा त्यांनी विचार केला; पण राहुल गांधींशिवाय या प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. त्यानंतर राहुल गांधींनी शिफारस केलेले फिजिओथेरपिस्ट भेटीला गेले. त्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांचा त्रास हळूहळू बरा झाला. केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वत: राहुल गांधी यांनी गुडघ्याच्या समस्येबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा त्यांना कठीण जाते तेव्हा ते पक्ष कार्यकर्ते आणि जनतेचा आधार घेतात.

भारत जोडो यात्रेने ७५ जिल्हे, १२ राज्ये आणि दाेन केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४६ दिवसांत ४,००० किलोमीटरहून अधिक अंतर कापले. यात्रेतील थांबे वगळता राहुल गांधी दररोज पायी चालत होते. यामध्ये तामिळनाडूची कन्याकुमारी ते केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा