शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार; त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण"- सॅम पित्रोदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:43 IST

"राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे.

Sam Pitroda on Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या अगदी जवळ असलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. यावेली त्यांनी राहुल गांधी आणि दिवंगत राजीव गांधी यांची थेट तुलना केली. "राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त  हुशार आहे. बौद्धिक असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकारदेखील आहेत. राजीव जास्त मेहनती होते. दोघांचा डीएनए एकच आहे. दोन्ही नेते आयडिया ऑफ इंडियाचे पुरस्कर्ते आहेत," अशी प्रतिक्रिया पित्रोदा यांनी दिली.

राजीव आणि राहुल यांना जनतेची काळजी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा शिकागो येथे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "मी राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, मनमोहन सिंग, व्हीपी सिंह, चंद्रशेखर आणि एचडी देवेगौडा यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. मला अनेक माजी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मिळाली, पण कदाचित राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की, राहुल अधिक बुद्धिवादी, विचारवंत आहेत. राजीव जरा जास्तच मेहनती होते. त्यांचा डीएनए एकच आहे. त्यांना लोकांबद्दल समान काळजी आणि भावना आहेत. ते खरच खूप साधे लोक आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक आकांशा नाहीत."

राहुलची प्रतिमा डागाळली "राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे. त्यांच्या दोन भारत दौऱ्यांचा यात खूप फायदा झाला. याचे संपूर्ण श्रेय मी राहुलला देतो. राहुल बराच काळ लढले आणि यातून बाहेर आले. त्यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत. एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या वारशावर, पक्षावर दिवसरात्र हल्ला करणे वाईट आहे. हे लोक जाणूनबुजून खोटं बोलतात, फसवतात आणि चुकीची माहिती पसरवतात. माध्यमांवर कुणाचे तरी नियंत्रण असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे," असेही पित्रोदा यावेळी म्हणाले.

राहुल सरकारवर टीका करतात, भारतावर नाहीपित्रोदा पुढे म्हणतात, "परदेश दौऱ्यांदरम्यान केंद्रावर टीका करणाऱ्या राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपची टीका निराधार आहे. सरकारवर टीका करणे म्हणजे भारतावर टीका करणे नव्हे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीका करायला हरकत नाही. काँग्रेसच्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्या भारतावर पक्षाच्या प्रत्येक नेत्याचा विश्वास आहे." दरम्यान, राहुल गांधी 8-10 सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, यात ते विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधतील, अशी माहितीही पित्रोदा यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान