शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:53 IST

अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Rahul Gandhi, Modi Govt No trust motion: काही लोक म्हणतात हा एक देश आहे, काही म्हणतात हा वेगवेगळ्या भाषांचा देश आहे. काही म्हणतात की हा धर्म आहे, हे सोने आहे, हे चांदी आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की या देशाचा आवाज एकच आहे. हा भारत देश एक आवाज आहे. भारत हा एक आवाज आहे, तो आवाज ऐकायचा असेल तर अंहकार बाजूला ठेवावाच लागेल. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाप्रणित एनडीए सरकारवर घणाघात केला. मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.

गांधी पुढे म्हणाले, "भारत हा एक संपूर्ण देश आहे. त्याचा आवाज एक आहे. या आवाजाची हाक तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुम्हाला तुमचा अंहकार बाजूला ठेवावा लागेल. मी रोज ८-१० किमी रनिंग (धावणे) करायचो. त्यामुळे मी सहज २०-२५ किमी चालू शकतो असे मला वाटायचे. माझ्यात तो अहंकार होता. पण जेव्हा मी तसे करायचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यातला अहंकार क्षणात नष्ट झाला. कारण दोन-तीन दिवसांतच माझे गुडघे इतके दुखू लागले की माझा अहंकार निघून गेला. माझा अहंकार लांडग्याएवढा मोठा होता, तो अगदी मुंगीएवढा शिल्लक राहिला."

"मी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेदरम्यान एका शेतकऱ्याने कापसाचा गठ्ठा दिला. तो मला म्हणाला की, राहुलजी माझ्याकडे हेच राहिले आहे. बाकी काही राहिले नाही. मी शेतकऱ्याला विचारले की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही... भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याची वेदना माझी वेदना बनली. त्याचाच अर्थ हा सारा प्रकार योग्य नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.

"मणिपूरमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. भाजपा सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची आणि भारतमातेची हत्या केली. तुम्ही लोक देशद्रोही आहात, तुमचे या देशावर किंवा देशातील लोकांवर प्रेम करत नाही," असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधी