शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Rahul Gandhi : "मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 18:05 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी बिहार महाआघाडीने रविवारी पाटणा येथील गांधी मैदानावर 'जन विश्वास महारॅली' आयोजित केली होती. या मेगा रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

गेल्या 40 वर्षात आज देशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी दुप्पट आहे. बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात बेरोजगार तरुणांची संख्या जास्त असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. देशातील बेरोजगारी वाढण्याचे मुख्य कारण सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या धोरणामुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत असं म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "जीएसटी आणि मोदी सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीमुळे देशात रोजगार निर्माण करणारे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. आज देशात बड्या उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होत आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची सर्व संपत्ती एका उद्योगपतीच्या हाती दिली आहे."

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील मोहना येथे भारत जोडो न्याय यात्रेच्या 50 व्या दिवशी राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित केलं. बेरोजगारीच्या मुद्द्यावर त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये माजी सैनिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला.

राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांनी सांगितलं होतं की, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत आलात पण इतर राज्यांचे - पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, गुजरात आणि पूर्वोत्तर राज्यांचे काय?' या सगळ्यानंतरच 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू झाली आहे. या दुसऱ्या प्रवासात 'न्याय' या शब्दाचा समावेश होता." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान