शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rahul Gandhi : "मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश, भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 18:05 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी बिहार महाआघाडीने रविवारी पाटणा येथील गांधी मैदानावर 'जन विश्वास महारॅली' आयोजित केली होती. या मेगा रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (GST) सारख्या मोठ्या निर्णयांमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. मोदींच्या धोरणांमुळे आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात जास्त बेरोजगारी आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

गेल्या 40 वर्षात आज देशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी दुप्पट आहे. बांगलादेश आणि भूतानपेक्षा भारतात बेरोजगार तरुणांची संख्या जास्त असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. देशातील बेरोजगारी वाढण्याचे मुख्य कारण सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या धोरणामुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत असं म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "जीएसटी आणि मोदी सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीमुळे देशात रोजगार निर्माण करणारे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. आज देशात बड्या उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होत आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची सर्व संपत्ती एका उद्योगपतीच्या हाती दिली आहे."

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील मोहना येथे भारत जोडो न्याय यात्रेच्या 50 व्या दिवशी राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित केलं. बेरोजगारीच्या मुद्द्यावर त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये माजी सैनिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला.

राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांनी सांगितलं होतं की, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत आलात पण इतर राज्यांचे - पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, गुजरात आणि पूर्वोत्तर राज्यांचे काय?' या सगळ्यानंतरच 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू झाली आहे. या दुसऱ्या प्रवासात 'न्याय' या शब्दाचा समावेश होता." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान