शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Rahul Gandhi: हेलिकॉप्टर, जहाज अन् तोफांनी नव्हे; तर देशातील नागरिकांमुळे देश मजबूत होतो, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:42 IST

देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तराखंड-

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देश केवळ हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी मजबूत होत नाही. तर देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तराखंडमध्ये बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादून येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

"तुम्ही असा अजिबात विचार करु नका की हिंदुस्थान मजबूत होत आहे. या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका. हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी देश मजबूत होत नाही. देश तेव्हाच मजबूत होतो जेव्हा देशातील नागरिक मजबूत होतो. जेव्हा देशातील जनता कुणालाही न घाबरता, कोणत्याही भीतीविना काम करू शकते. जेव्हा देशाचा आवाज कानाकोपऱ्यात सहज पोहचू शकतो, तेव्हाच देश मजबूत होतो", असं राहुल गांधी म्हणाले. 

"बांगलादेश युद्धावेळी देश मजबूत होता. आपल्या संस्था मजबूत होत्या. सैन्य आणि सरकारमध्ये जबरदस्त समन्वय होता. सरकार सैन्याचं ऐकायचं आणि सैन्य देखील सरकारचं ऐकायचं. दोघंही एकमेकांचा आदर करत होते. संवाद होता. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. त्यामुळेच पाकिस्तानला १३ दिवसांत पराभूत करू शकलो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही", असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttarakhandउत्तराखंड