शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

Rahul Gandhi: हेलिकॉप्टर, जहाज अन् तोफांनी नव्हे; तर देशातील नागरिकांमुळे देश मजबूत होतो, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:42 IST

देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तराखंड-

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देश केवळ हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी मजबूत होत नाही. तर देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तराखंडमध्ये बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादून येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

"तुम्ही असा अजिबात विचार करु नका की हिंदुस्थान मजबूत होत आहे. या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका. हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी देश मजबूत होत नाही. देश तेव्हाच मजबूत होतो जेव्हा देशातील नागरिक मजबूत होतो. जेव्हा देशातील जनता कुणालाही न घाबरता, कोणत्याही भीतीविना काम करू शकते. जेव्हा देशाचा आवाज कानाकोपऱ्यात सहज पोहचू शकतो, तेव्हाच देश मजबूत होतो", असं राहुल गांधी म्हणाले. 

"बांगलादेश युद्धावेळी देश मजबूत होता. आपल्या संस्था मजबूत होत्या. सैन्य आणि सरकारमध्ये जबरदस्त समन्वय होता. सरकार सैन्याचं ऐकायचं आणि सैन्य देखील सरकारचं ऐकायचं. दोघंही एकमेकांचा आदर करत होते. संवाद होता. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. त्यामुळेच पाकिस्तानला १३ दिवसांत पराभूत करू शकलो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही", असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttarakhandउत्तराखंड