शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"द्वेषामुळे वडिलांना गमावले, आता देश गमावू इच्छित नाही!" काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात; प्रमुख नेत्यांची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:47 IST

तमिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये तीन दशकांपूर्वी एका रॅलीत घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी एक रोपही लावले. यावेळी काँग्रेसचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अलागिरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

आदेश रावल -

श्रीपेरुम्बुदुर / चेन्नई/ नवी दिल्ली : द्वेष आणि विभाजनामुळे मी माझ्या वडिलांना गमावले आहे; मात्र देश गमावू इच्छित नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी बुधवारी दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली अर्पण केली आणि एका प्रार्थना सभेत सहभागी झाले. 

तमिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये तीन दशकांपूर्वी एका रॅलीत घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी एक रोपही लावले. यावेळी काँग्रेसचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अलागिरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, मी माझ्या प्रिय देशाला गमावणार नाही. प्रेम द्वेषावर विजय मिळवेल. आशा भीतीवर मात करेल. श्रीपेरुम्बुदुर येथील राजीव गांधी स्मारकाला दिलेल्या भेटीचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.  

३५०० किमीची भारत जोडो यात्रा १२ राज्यांतून जाणार आहे. ही यात्रा ११ सप्टेंबर रोजी केरळात येईल, तर पुढील १८ दिवसांत विविध राज्यांतून ३० सप्टेंबर रोजी कर्नाटकात दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा उत्तरेकडे जाईल. यासाठी प्रत्येक राज्यात मोठी तयारी करण्यात आली आहे.

१५० दिवस कंटेनरमध्येच राहणार राहुल गांधीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची १५० दिवस चालणारी भारत जोडो यात्रा बुधवारी कन्याकुमारीहून सुरू झाली असून, यात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ११७ नेते व कार्यकर्ते ३५७० किलोमीटर पायी चालणार आहेत. या सर्वांची राहण्याची, तसेच जेवणाची व्यवस्था हॉटेल किंवा नेत्याच्या घरी केलेली नाही, तर पक्षाने ५० कंटेनर तयार केले असून, त्यात राहुल गांधी यांच्यासह सर्व नेते रात्री थांबणार आहेत.

ऐतिहासिक क्षण  : सोनिया गांधी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ हा भारतीय राजकारणासाठी परिवर्तनकारी क्षण आहे. त्यातून पक्षाला संजीवनी मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. 

देश मोठ्या संकटात : राहुल  राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या संघटना भारताच्या संस्थांवर आक्रमण करत आहेत. देश मोठ्या आर्थिक संकटाने घेरला गेला आहे. भारताला एकजूट करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यांना असे वाटते की, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबता येईल. पण, विरोधी पक्षाचे नेते भित्रे नाहीत. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीTamilnaduतामिळनाडू