शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधीच जबाबदार - स्मृती ईराणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 09:45 IST

अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत.

अमेठी - आज देशामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र त्या अगोदर अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. संजय गांधी हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल रोजी उपचाराविना मृत पावलेल्या रुग्णाच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप स्मृती ईराणी यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये स्मृती ईराणी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज मी निशब्द आहे, एखादा माणूस खालच्या पातळीपर्यंत राजकारण करु शकतो हा विचार कधी केला नव्हता. या गरीब रुग्णाकडे मोदी सरकारचं आयुष्यमान भारत कार्ड होतं मात्र हॉस्पिटल राहुल गांधी यांचे असल्याने त्याच्यावर उपचार झाले नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अमेठीतील लोकांना याचं उत्तर दिलं पाहिजे की, या निर्दोष माणसाला का मारलं गेलं? असा सवाल स्मृती ईराणी यांनी विचारला आहे. 

दरम्यान स्मृती ईराणी यांनी केलेला दावा संजय गांधी हॉस्पिटल प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे. 40 वर्षीय नन्हेलाल मिश्रा या रुग्णाला 25 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यांचे यकृत खराब झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र रुग्णाचे नातेवाईक अरुण कुमार मिश्रा यांनी दावा केला आहे की, रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करताना 3 हजार रुपये भरण्यात आले होते. आयुष्यमान कार्डमुळे रुग्णावर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. आम्ही आयुष्यमान कार्ड रुग्णालय कर्मचाऱ्याला दाखवले त्यावर त्यांनी सांगितले की आयुष्यमान कार्ड योगी आणि मोदी यांचे आहे. हे हॉस्पिटल काँग्रेसचे असल्याने येथे आयुष्यमान कार्ड चालत नाही. त्यानंतर 26 एप्रिलला या रुग्णाचा मृत्यू झाला. अरुण मिश्रा यांनी अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती ईराणी यांनी हे प्रकरण सांगितले. 

पण स्मृती ईराणी यांनी केलेला दावा फेटाळून लावत रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना यकृताची समस्या होती. आमच्याकडून शक्य तेवढे उपचार रुग्णावर करण्यात आले, रुग्णालयात कधीच राजकारण केले जात नाही. रुग्णांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे असं रुग्णालयाचे एमडी कॅप्टन सूर्य महेंद्रसिंह चौधरी यांनी सांगितले. 

तसेच नन्हेलाल मिश्रा यांचे घर हॉस्पिटलपासून 3 किमी अंतरावर आहे. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हते. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. 26 एप्रिलपासून आजपर्यंत त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली नाही मात्र आता भाजपाकडून त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असे रुग्णालयाचे प्रबंधक भोलानाथ त्रिपाठी यांनी सांगितले.   

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक