शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधीच जबाबदार - स्मृती ईराणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 09:45 IST

अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत.

अमेठी - आज देशामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र त्या अगोदर अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. संजय गांधी हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल रोजी उपचाराविना मृत पावलेल्या रुग्णाच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप स्मृती ईराणी यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये स्मृती ईराणी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज मी निशब्द आहे, एखादा माणूस खालच्या पातळीपर्यंत राजकारण करु शकतो हा विचार कधी केला नव्हता. या गरीब रुग्णाकडे मोदी सरकारचं आयुष्यमान भारत कार्ड होतं मात्र हॉस्पिटल राहुल गांधी यांचे असल्याने त्याच्यावर उपचार झाले नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अमेठीतील लोकांना याचं उत्तर दिलं पाहिजे की, या निर्दोष माणसाला का मारलं गेलं? असा सवाल स्मृती ईराणी यांनी विचारला आहे. 

दरम्यान स्मृती ईराणी यांनी केलेला दावा संजय गांधी हॉस्पिटल प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे. 40 वर्षीय नन्हेलाल मिश्रा या रुग्णाला 25 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यांचे यकृत खराब झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र रुग्णाचे नातेवाईक अरुण कुमार मिश्रा यांनी दावा केला आहे की, रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करताना 3 हजार रुपये भरण्यात आले होते. आयुष्यमान कार्डमुळे रुग्णावर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. आम्ही आयुष्यमान कार्ड रुग्णालय कर्मचाऱ्याला दाखवले त्यावर त्यांनी सांगितले की आयुष्यमान कार्ड योगी आणि मोदी यांचे आहे. हे हॉस्पिटल काँग्रेसचे असल्याने येथे आयुष्यमान कार्ड चालत नाही. त्यानंतर 26 एप्रिलला या रुग्णाचा मृत्यू झाला. अरुण मिश्रा यांनी अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती ईराणी यांनी हे प्रकरण सांगितले. 

पण स्मृती ईराणी यांनी केलेला दावा फेटाळून लावत रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना यकृताची समस्या होती. आमच्याकडून शक्य तेवढे उपचार रुग्णावर करण्यात आले, रुग्णालयात कधीच राजकारण केले जात नाही. रुग्णांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे असं रुग्णालयाचे एमडी कॅप्टन सूर्य महेंद्रसिंह चौधरी यांनी सांगितले. 

तसेच नन्हेलाल मिश्रा यांचे घर हॉस्पिटलपासून 3 किमी अंतरावर आहे. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हते. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. 26 एप्रिलपासून आजपर्यंत त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली नाही मात्र आता भाजपाकडून त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे असे रुग्णालयाचे प्रबंधक भोलानाथ त्रिपाठी यांनी सांगितले.   

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक