शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 06:27 IST

महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत असून, ते राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांचे फोन घेणेही आता बंद केले आहे.पक्षाच्या २५ व २७ मे रोजी झालेल्या बैठकांनंतर राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांना भेटही दिलेली नाही. काही नेते काल, मंगळवारी त्यांना भेटण्यास त्यांच्या निवास्थानी गेले होते, पण त्यांना टाळून राहुल गांधी आपल्या होंडा कारमधून निघून गेले. बाहेर जाताना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनाही कळविले नव्हते. नंतर ते प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेटभागातील घरी दिसले. नेत्यांशी बोलण्यास, भेटण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याने प्रियांका गांधीच नेत्यांशी चर्चा करीत आहेत.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची बित्तंबातमी माध्यमांना मिळाल्याने ते संतापले आहेत. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना ज्योतिरादित्य सिंदिया लंडनला गेल्याबद्दल राहुल यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. काही नेत्यांनी आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी कसा आग्रह धरला, याचा उल्लेख त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. बैठकीतील काही भागच एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. त्यामुळे ती फित काँग्रेस नेत्याकडूनच गेली, अशी राहुल गांधी यांची खात्री आहे.हंगामी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, ए. के. अँथनी यांची नावे पुढे येत आहेत. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते. मोतिलाल व्होरा व शीला दीक्षित ही नावेही घेतली जात आहेत. पण त्यांना पक्षाची सूत्रे सोपवली जातील का, ही शंका आहे.>कार्यकर्त्यांचे धरणेराहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी काँग्रेसचे २0 कार्यकर्ते आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यातघेऊ न पोलीस ठाण्यात नेले. त्यांनासोडून देण्यात आल्यावर ते कार्यकर्तेपुन्हा राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९