शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेली अन् वायनाडमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधींना लाखो रुपयांचा निधी मिळाला; निवडणूक आयोगाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 20:46 IST

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना निवडणूक लढवण्यासाठी ५० लाख रुपये मिळाले. खासदार कंगना राणौत यांच्या विरोधात निवडणूक लढवताना काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना सर्वाधिक ८७ लाख रुपये मिळाले आहेत. केसी वेणुगोपाल यांना ७० लाख रुपये मिळाले.

केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेसच्याराहुल गांधींना पक्ष निधीतून १ कोटी ४० लाख रुपये मिळाले होते. दोन्ही ठिकाणांहून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसनेराहुल गांधींना ७०-७० लाख रुपये दिले होते. काँग्रेसने ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

मोदी सरकारसाठी आली महत्वाची बातमी; भारत या यादीत अमेरिका-चीनपेक्षाही पुढे!

पक्षाने विक्रमादित्य सिंह यांना जास्त निधी दिला. मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना ८७ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यासमोर विक्रमादित्य सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अमेठी लोकसभा जागेवर स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनाही पक्षाकडून ७० लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय केरळमधील अलाप्पुझा येथील केसी वेणुगोपाल, तामिळनाडूमधील विरुधुनगर येथील मणिकम टागोर, कर्नाटकातील गुलबर्गा येथील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण आणि पंजाबमधील श्री आनंदपूर साहिबमधून काँग्रेसचे उमेदवार विजय इंदर सिंगला यांनाही प्रत्येकी ७० लाख रुपये मिळाले आहेत.

आनंद शर्मा यांना ४६ लाख आणि दिग्विजय सिंह यांना ५० लाख रुपये मिळाले. मात्र, दोन्ही नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून निवडणूक जिंकली आहे. मात्र, नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. ४ जून रोजी निकाल लागला. काँग्रेसने गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुका आणि अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे आपले 'आंशिक निवडणूक खर्चाचे विवरण' सादर केले होते. हा तपशील पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या एकरकमी बाबत  होता.

उमेदवार निवडणुकीत मर्यादेपर्यंतच खर्च करू शकतो. मात्र, राजकीय पक्षांबाबत तशी तरतूद नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवार ९५ लाख रुपये आणि विधानसभा निवडणुकीत ४० लाख रुपये खर्च करु शकतो. काही राज्यांमध्ये ही मर्यादा वेगळी आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस