शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 20:37 IST

'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.'

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना चीनचे कौतुक केले. चीन हा शांततेचा देश आहे. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चीनच्या रणनीतीचाही उल्लेख केला. तसेच, चीनने केलेल्या विकासाबद्दल आणि पाश्चिमात्य देशांच्या विचारसरणीवरही भाष्य केले.

राहुल चीनबद्दल काय म्हणाले?राहुल गांधी म्हणाले की, चीनमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची पायाभूत सुविधा(रेल्वे, विमानतळ)  दिसते, ती सर्व निसर्गाशी, नदीच्या शक्तीशी जोडलेली आहे. चीनचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. अमेरिकेचा विचार केला तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. चीनला शांततेत किती रस आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. सध्या भारत आणि अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे, असेही राहुल म्हणाले.

जम्मू-काश्मीरबाबत राहुल यांचे वक्तव्यराहुल यांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी जम्मू-काश्मीरला 'तथाकथित हिंसक ठिकाण' म्हटले. काश्मीर हे बंडखोरी प्रवण राज्य आहे आणि तथाकथित हिंसक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आमचे 40 जवान शहीद झाले, त्या ठिकाणीही मी गेलो होतो. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठात राहुल यांनी दिलेली इतर अनेक विधानेही चर्चेचा विषय बनली आहेत. पेगाससबाबतही त्यांनी आपते मत मांडले आहे.

केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख

भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे राहुल म्हणाले. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. मला अधिकाऱ्यांनी फोनवर काळजीपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला होता. कारण फोन रेकॉर्ड केले जात होते. भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. अशा प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले, जे अजिबात मी केले नाहीत, असेही राहुल म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीर