शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
2
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
3
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
4
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
5
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
6
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
7
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
8
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
9
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
10
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
11
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
12
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
13
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
14
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
15
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
16
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
17
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
18
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
19
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
20
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप

पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 12:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे

नवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. राहुल गांधी यांनी देशामधील परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं भाजपा नेते जाफर इस्लाम बोलले आहेत. 'ज्या व्यक्तीला अम्मा आणि इंदिरामधील फरक कळत नसेल, ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करण्याइतकी सक्षम नाही', असा उपरोधिक टोला जाफर इस्लाम यांनी लगावला आहे.

आणखी वाचामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीकेरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणीयाशिवाय भाजपा नेते एस प्रकाश यांनाही राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी बेजबाबदार वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं एस प्रकाश बोलले आहेत. 'चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढू शकतो', असं एस प्रकाश यांनी सांगितलं. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करताना त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने भाषणं छोटी होत चालली असल्याची टीका केली होती. 'माझी आई 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर गेली होती. पंतप्रधानांनी आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण दिल्याचं तिने मला सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने त्यांच्या भाषणाची लांबी कमी होत चालली आहे', असं राहुल गांधी बोलले होते. 

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याचीही टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतक-यांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी