शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जन आक्रोश रॅलीत भाजपाला घेरणार काँग्रेस, राहुल गांधी करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 08:42 IST

मोदी सरकारवर दिवसेंदिवस जनतेचा वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारविरोधात दिवसेंदिवस जनतेच्या वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे. या जन आक्रोश रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, भाजपालाही घेरण्याचा त्यांचा इरादा आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसनं नवी दिल्लीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या सार्वजनिक रॅलीचं आयोजन केलं आहे.या रॅलीमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीची झलक पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत म्हणाले, या रॅलीला जे नाव दिलं आहे जन आक्रोश रॅली, त्यातून एक वेगळाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व स्तरांतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं चित्र निर्माण झालंय. असं भीतीदायक वातावरण, दहशतवादाचं वातावरण, तिरस्काराचं वातावरण, द्वेषाचं वातावरण, हिंसेचं वातावरण आधी कधीच नव्हतं. देशात महागाई आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दराला तर आग लागलेली असून, सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. मोदींनी दिलेली आश्वासनं त्यांना चार वर्षांत पूर्ण करता आलेली नाहीत. स्मार्ट सिटीचा अद्याप काहीही थांगपत्ता नाही. न्याय व्यवस्थेची स्थितीसुद्धा चिंताजनक आहे, असंही गेहलोत म्हणालेत. देशातील लोकांच्या विचारांचं प्रतिबिंब या रॅलीतून पाहायला मिळणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग संबोधित करणार आहेत. या रॅलीसाठी राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच रॅलीच्या आयोजनावर प्रियंका गांधी नजर ठेवून आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी