शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 23:02 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात कामे केली जात आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,” असे राहुल गांधी म्हणाले.

“गुजरात हे नशेचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांचीच परवानगी?,” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.अनेकआश्वासनं“सत्तेत आल्यानंतर काँग्रेस कोरोना महासाथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देईल. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देऊ. आम्ही इंग्रजी माध्यमाच्या ३००० शाळा उघडू आणि मुलींना मोफत शिक्षण देऊ. सध्या १००० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिले जातील. मला बेरोजगारी संपवायची आहे. गुजरातमधील १० लाख तरुणांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल, याची मी खात्री देतो,” असं राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरात