शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"यावेळी आमचाही आवाज मोठा आहे"; राहुल गांधींनी ओम बिर्लांना सांगितली विरोधकांची ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 12:39 IST

Rahul Gandhi : ओम बिर्ला यांची या पदावर निवड झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Lok Sabha Speaker Election : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी आवाजी मतदानाने एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. ओम बिर्ला यांची या पदावर निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनावर नेले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.  तसेच यावेळी विरोधी पक्षाचा आवाज गेल्या वेळीच्या तुलनेत जास्त असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना खुर्चीवर बसवण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. १७ व्या लोकसभेत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी तुमचा गेल्यावेळचा कार्यकाळ सुवर्णमय होता आणि या वेळीही तुम्ही असेच नेतृत्व करत राहाल अशी आशा आहे, असं म्हटलं. त्यांच्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभापती ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

"तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आणि तुमच्या यशस्वी निवडीबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. संपूर्ण विरोधी पक्ष आणि भारत आघाडीच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच आहात. सरकारकडे राजकीय ताकद आहे, पण विरोधकांकडेही भारताचा आवाज आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी विरोधकांची ताकद जास्त आहे. सभागृह चालवण्यात आम्ही तुम्हाला सहकार्य करावे अशी विरोधकांची इच्छा आहे. विरोधी पक्ष तुमच्या कामात मदत करू इच्छितात. सभागृहाचे कामकाज वारंवार आणि चांगले व्हावे अशी आमची इच्छा आहे. विश्वासाच्या आधारावर सहकार्य घडणे खूप महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षाचा आवाज या सभागृहात मांडण्याची मुभा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

"सभागृह कसे चालते हे महत्त्वाचे नाही. देशाचा आवाज कसा बुलंद होतोय हे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीने हे दाखवून दिले आहे की, भारतातील जनतेला संविधानाचे रक्षण करायचे आहे. विरोधकांना तुमच्या बाजूने बोलण्याची संधी देऊन संविधानाचे रक्षण केले जाईल, याची आम्हाला खात्री आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदom birlaओम बिर्ला