शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं पण मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 10:53 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हटलं की, भाजपा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाही, ते फक्त अदानींचं कर्ज माफ करू शकतात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, असं आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही तसं केलं, असंही राहुल म्हणाले. "मी पुन्हा एकदा आश्वासन देत आहे की आम्ही छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी काहीही केलं नाही. मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. मी जे सांगतो ते करतो" असंही म्हटलं आहे.

"भाजपाने शेतकऱ्यांचे पैसे अदानी ग्रुपला दिले"

एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आणि आरोप केला की हा पक्ष शेतकऱ्यांचा पैसा अदानी समूहाला देतो आणि ते "दोन-तीन उद्योगपतींच्या" फायद्यासाठी काम करतात असा दावा केला. राहुल म्हणाले, "तुम्ही कोणतेही सरकार पाहिल्यास, राज्यातील किंवा देशातील सर्वात श्रीमंत लोकांना फायदा पोहोचवण्याचे किंवा देशातील किंवा राज्यातील सर्वात गरीब लोकांना मदत करण्याचे मार्ग आहेत. जिथे आमचे सरकार शेतकरी, मजूर आणि गरिबांना मदत करते. तर भाजपा सरकार फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलते पण शेवटी अदानींना मदत करते."

राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या जनतेला आश्वासन दिले की, राज्यात काँग्रेसची सत्ता परत आल्यास सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल नक्षलग्रस्त बस्तर विभागातील भानुप्रतापपूर आणि फरासगाव या शहरांमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करताना गांधींनी विचारले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ओबीसी (इतर मागासवर्गीयांचा) उल्लेख करतात, तर मग ते जातीच्या जनगणनेला का घाबरतात. ते म्हणाले, "काँग्रेस (केंद्रात) सत्तेवर आल्यास, देशात जात जनगणना केली जाईल."

"भारत सरकार खासदारांद्वारे चालवले जात नाही"

"भारत सरकार खासदारांद्वारे चालवले जात नाही तर 90 सचिव (अधिकारी) चालवतात आणि ते देशाचा अर्थसंकल्प ठरवतात. मला आढळलं की केंद्रातील एकूण 90 सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी आहेत आणि तीन आदिवासी आहेत. अर्थसंकल्प ठरवताना केवळ पाच टक्के ओबीसी आणि 0.1  टक्के आदिवासींचे प्रतिनिधित्व आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते. देशात ओबीसी आणि आदिवासींची लोकसंख्या पाच टक्के आणि 0.1 टक्के आहे का? देशाच्या लोकसंख्येमध्ये ओबीसींचा वाटा जवळपास 50 टक्के आहे, पण मोदीजी ओबीसी, दलित आणि आदिवासींची लोकसंख्या लपवण्याचा प्रयत्न करत आहेत" असा आरोप गांधी यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा