शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं पण मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 10:53 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हटलं की, भाजपा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाही, ते फक्त अदानींचं कर्ज माफ करू शकतात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, असं आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही तसं केलं, असंही राहुल म्हणाले. "मी पुन्हा एकदा आश्वासन देत आहे की आम्ही छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी काहीही केलं नाही. मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. मी जे सांगतो ते करतो" असंही म्हटलं आहे.

"भाजपाने शेतकऱ्यांचे पैसे अदानी ग्रुपला दिले"

एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आणि आरोप केला की हा पक्ष शेतकऱ्यांचा पैसा अदानी समूहाला देतो आणि ते "दोन-तीन उद्योगपतींच्या" फायद्यासाठी काम करतात असा दावा केला. राहुल म्हणाले, "तुम्ही कोणतेही सरकार पाहिल्यास, राज्यातील किंवा देशातील सर्वात श्रीमंत लोकांना फायदा पोहोचवण्याचे किंवा देशातील किंवा राज्यातील सर्वात गरीब लोकांना मदत करण्याचे मार्ग आहेत. जिथे आमचे सरकार शेतकरी, मजूर आणि गरिबांना मदत करते. तर भाजपा सरकार फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलते पण शेवटी अदानींना मदत करते."

राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या जनतेला आश्वासन दिले की, राज्यात काँग्रेसची सत्ता परत आल्यास सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल नक्षलग्रस्त बस्तर विभागातील भानुप्रतापपूर आणि फरासगाव या शहरांमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करताना गांधींनी विचारले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ओबीसी (इतर मागासवर्गीयांचा) उल्लेख करतात, तर मग ते जातीच्या जनगणनेला का घाबरतात. ते म्हणाले, "काँग्रेस (केंद्रात) सत्तेवर आल्यास, देशात जात जनगणना केली जाईल."

"भारत सरकार खासदारांद्वारे चालवले जात नाही"

"भारत सरकार खासदारांद्वारे चालवले जात नाही तर 90 सचिव (अधिकारी) चालवतात आणि ते देशाचा अर्थसंकल्प ठरवतात. मला आढळलं की केंद्रातील एकूण 90 सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी आहेत आणि तीन आदिवासी आहेत. अर्थसंकल्प ठरवताना केवळ पाच टक्के ओबीसी आणि 0.1  टक्के आदिवासींचे प्रतिनिधित्व आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते. देशात ओबीसी आणि आदिवासींची लोकसंख्या पाच टक्के आणि 0.1 टक्के आहे का? देशाच्या लोकसंख्येमध्ये ओबीसींचा वाटा जवळपास 50 टक्के आहे, पण मोदीजी ओबीसी, दलित आणि आदिवासींची लोकसंख्या लपवण्याचा प्रयत्न करत आहेत" असा आरोप गांधी यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा