शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Rahul Gandhi: दहशतवाद ना नोटबंदीनं थांबला, ना कलम ३७० रद्द केल्यानं; राहुल गांधींचा श्रीनगरमधील हल्ल्यावरुन केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:09 IST

Rahul Gandhi: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली-

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. श्रीनगरमधील एका शाळेत आज दहशतवादी घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करत दोन शिक्षकांवर गोळ्या झाडल्या. श्रीनगरमध्ये या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून मन सुन्न करणाऱ्या घटनेनं सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. राहुल गांधींनीही या घटनेची दखल घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. 

"काश्मीरमधील हिंसक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दहशतवाद ना नोटबंदी केल्यानं थांबना, ना कलम ३७० रद्द केल्यानं. केंद्र सरकार सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. काश्मीरी बंधू-भगिनींवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचा मी निषेध व्यक्त करतो आणि मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

श्रीनगरमध्ये शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती आहे. श्रीनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांमध्ये एक शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांचं नाव सतिंदर कौर असं आहे. तर दीपक चंद नावाच्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. दोघंही अल्लोचोईबाग येथील रहिवासी आहेत. शाळेत घुसून थेट अंदाधुंद गोळीबार करण्यास दहशतवाद्यांनी सुरुवात केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTerrorismदहशतवाद