शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:30 IST

सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे.

नवी दिल्लीः लडाखजवळ चीन अन् भारत आमनेसामने आल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना हल्लाबोल केला आहे. सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रत्येकास सीमेचे वास्तव माहीत आहे, पण तुमच्या मनाच्या आनंदासाठी ‘शाह-यद’ हा विचार चांगला आहे. बिहारमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्त्राईलनंतर संपूर्ण जग सहमत आहे की इतर कोणताही देश आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असेल तर तो भारत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी कविता लिहिली. त्या कवितेतून त्यांनी अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूंकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठकांच्या फे-या झाल्या. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादासंदर्भात गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अलीकडेच त्यांनी असा प्रश्न केला होता की, कोणतेही चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरले नाहीत, याची खात्री सरकार करू शकेल का?चिनी सैन्य युद्धाच्या तयारीत व्यस्तभारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाचा आणि वाटाघाटीचा मार्ग निवडला असला तरी चिनी सैन्य सतत युद्धाच्या तयारीत व्यस्त आहे. तिबेट सीमेवर युद्धाचा सराव केल्यानंतर आता चिनी सैन्याने देखील चीनच्या वायव्य भागात डोंगरावर लढा देण्यासाठी युद्ध सराव केला आहे. चीनची अधिकृत मीडिया सातत्याने चिनी सैनिकी युद्धाचे व्हिडिओ शेअर करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी