शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 16:01 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाभारत-चीन सीमा समेटानंतर ट्विट करून केला सवालवर्तमानातील परिस्थिती सांगितली नसल्याचा दावा

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग लेक येथे असलेल्या सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. यानंतर आता राजकारण तापयला लागले असून, विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (rahul gandhi asked why is govt insulting the sacrifice of our jawans)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वर्तमानात न शांतता आहे आणि ना शांततापूर्ण वातावरण आहे, असा दावा करत, सरकार आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान का करत आहे आणि आपला भूभाग चीनला का देत आहेत, असा रोकडा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे. 

काय म्हणाले राजनाथ सिंह राज्यसभेत?

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणindia china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार