शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:13 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.गुजरात हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तेथे आम्ही एवढ्या जागा केवळ राहुल गांधी यांच्यामुळे मिळवू शकलो. यंदा आमची कामगिरी चमकदारच आहे, असे कमलनाथ म्हणाले. काँग्रेसची कामगिरी प्रभावीच राहिली, आमचे बळ वाढले. राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली मिळालेला विजय हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांच्या प्रभावी प्रचारामुळे काँग्रेसची कामगिरी सरस राहिली. आम्हाला अपेक्षित मुक्काम गाठता आला नाही; परंतु एकूण आमचा हा प्रवास चांगलाच झाला, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.हा नैतिक विजय - गेहलोतराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत करण्यात आलेल्या प्रचाराचे हे यश असून, हा काँग्रेसचा नैतिक विजय होय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी टिष्ट्वटवर दिली आहे.‘ईव्हीएम’मुळे भाजपाविजयी - संजय निरुपमगुजरातमधील भाजपाच्या विजयामागे जनता नव्हे तर ईव्हीएम आहे, असा स्पष्ट आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भारतीय लोकशाहीला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण गुजरात भाजपाच्या विरोधात होता. पंतप्रधानांच्या प्रचारसभेत खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या, तरीही गुजरातमध्ये भाजपा विजयी झाले. या विजयामागे जनमत नव्हे तर ईव्हीएम आहे, असे त्यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे.भाजपाचा आता विजय, पण २०१९ ची लोकसभा सोपी नाही-गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी अपेक्षेपेक्षाही खाली घसरल्याचे लक्षात घेता, २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सहजसोपी नाही, असे तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) वरिष्ठ नेत्याने सोमवारी म्हटले आहे.टीआरएसचे लोकसभेतील सभागृह नेते ए.पी. जितेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, भाजपाने मूलत: आपले प्रशासन तपासून घेतले पाहिजे. गुजरातेतील निवडणूक निकालाने भाजपाला चार पावले मागे जावे लागल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केले.काँग्रेसचा दिमाखदार विजयकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हार्दिक अभिनंदन. गुजरातमधील दिमाखदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे मोठे यश होय. भाजपाला जेमतेम गुजरातेत सत्ता राखता आली. तथापि, लवकर गुजरातच्या जनतेच्या पदरी निराशा येईल. यादव यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू गटाने काँग्रेससोबत युती करून चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा या गटाने जिंकल्या आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजराती जनताही निराश होईल.- शरद यादव, जेडीयूचे बंडखोर नेतेभाजपाला पर्याय नाहीगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन. देशात भाजपाला पर्यायच नाही. मोदी आणि शहा यांच्या संघटन कौशल्याचा हा विजय आहे.- वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्रीजनतेने स्वीकारले राहुलचे नेतृत्वगुजरात विधानसभा निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करणाºया भाजपाला जेमतेम सत्तेचा सोपान राखता आला. गुजरातच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांचे नेतृत्वही स्वीकारले आहे.- सचिन पायलट, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस