शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:13 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.गुजरात हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तेथे आम्ही एवढ्या जागा केवळ राहुल गांधी यांच्यामुळे मिळवू शकलो. यंदा आमची कामगिरी चमकदारच आहे, असे कमलनाथ म्हणाले. काँग्रेसची कामगिरी प्रभावीच राहिली, आमचे बळ वाढले. राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली मिळालेला विजय हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. राहुल गांधी यांच्या प्रभावी प्रचारामुळे काँग्रेसची कामगिरी सरस राहिली. आम्हाला अपेक्षित मुक्काम गाठता आला नाही; परंतु एकूण आमचा हा प्रवास चांगलाच झाला, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.हा नैतिक विजय - गेहलोतराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत करण्यात आलेल्या प्रचाराचे हे यश असून, हा काँग्रेसचा नैतिक विजय होय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी टिष्ट्वटवर दिली आहे.‘ईव्हीएम’मुळे भाजपाविजयी - संजय निरुपमगुजरातमधील भाजपाच्या विजयामागे जनता नव्हे तर ईव्हीएम आहे, असा स्पष्ट आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भारतीय लोकशाहीला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा मोठा धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण गुजरात भाजपाच्या विरोधात होता. पंतप्रधानांच्या प्रचारसभेत खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या, तरीही गुजरातमध्ये भाजपा विजयी झाले. या विजयामागे जनमत नव्हे तर ईव्हीएम आहे, असे त्यांनी टिष्ट्वटवर म्हटले आहे.भाजपाचा आता विजय, पण २०१९ ची लोकसभा सोपी नाही-गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी अपेक्षेपेक्षाही खाली घसरल्याचे लक्षात घेता, २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सहजसोपी नाही, असे तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) वरिष्ठ नेत्याने सोमवारी म्हटले आहे.टीआरएसचे लोकसभेतील सभागृह नेते ए.पी. जितेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, भाजपाने मूलत: आपले प्रशासन तपासून घेतले पाहिजे. गुजरातेतील निवडणूक निकालाने भाजपाला चार पावले मागे जावे लागल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केले.काँग्रेसचा दिमाखदार विजयकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हार्दिक अभिनंदन. गुजरातमधील दिमाखदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे मोठे यश होय. भाजपाला जेमतेम गुजरातेत सत्ता राखता आली. तथापि, लवकर गुजरातच्या जनतेच्या पदरी निराशा येईल. यादव यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू गटाने काँग्रेससोबत युती करून चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा या गटाने जिंकल्या आहेत. इतर राज्यांप्रमाणे गुजराती जनताही निराश होईल.- शरद यादव, जेडीयूचे बंडखोर नेतेभाजपाला पर्याय नाहीगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन. देशात भाजपाला पर्यायच नाही. मोदी आणि शहा यांच्या संघटन कौशल्याचा हा विजय आहे.- वसुंधरा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्रीजनतेने स्वीकारले राहुलचे नेतृत्वगुजरात विधानसभा निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचा दावा करणाºया भाजपाला जेमतेम सत्तेचा सोपान राखता आला. गुजरातच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांचे नेतृत्वही स्वीकारले आहे.- सचिन पायलट, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस