शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:51 IST

काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली :पंजाब सरकारच्या सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी राजीनामा देऊन गांधी कुटुंबाची भेट घेतली तेव्हाच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून घेतला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या मुद्यावर अमरिंदर सिंग राजीनाम्याची धमकी देत होते. जेव्हा प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगितले की, कॅप्टन सिंग यांचा प्रभाव राज्यात घटत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणूक जिंकू शकणार नाही. तेव्हा प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याला दुजोरा मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळ्या पाहणी केल्या. या पाहणीत एक बाब समान होती की, पंजाबमधील शेतकरी अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असून ती मते अकाली दल किंवा आम आदमी पक्षाला जाऊ शकतात. 

परिस्थिती निर्माण केली : अमरिंदर सिंग यांच्या इच्छेविरोधात सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि कॅप्टन यांच्या नेतृत्वाला ते शह देऊ लागले तेव्हा पक्ष श्रेष्ठींनी अशी परिस्थिती निर्माण केली की, अमरिंदर सिंग यांनी स्वत:च राजीनामा द्यावा. कॅप्टन यांनी राजीनाम्याची धमकी देताच सोनिया गांधी यांनी ठीक आहे, असे म्हणत राजीनामा तत्काळ स्वीकारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPunjabपंजाब