शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमध्ये मंत्र्यांपेक्षा नोकरशहांना जास्त अधिकार- राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 10:20 IST

नोकरशहांकडून सुधारणांमध्ये खोडा घालण्याचं काम- रघुराम राजन

दावोस: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील नोकरशाहांवर कडाडून टीका केली आहे. आर्थिक सुधारणा अपयशी ठरण्यात नोकरशहांचा फार मोठा हात आहे, अशा शब्दांमध्ये राजन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बरसले. नोकरशहांमुळे आर्थिक सुधारणांचा गाडा पुढे जाण्यात अडथळे येतात, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फार अधिकार नाहीत. त्या तुलनेत नोकरशहांच्या हातात जास्त अधिकार असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. राजन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दावोसमध्ये मुलाखत दिली. दावोसमध्ये सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे. सरकारी बँकांच्या खासगीकरणाबद्दल राजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नोकरशाह आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली. 'सरकारी बँकांमधील हस्तक्षेप थांबायला हवा. कोणत्याही नोकरशहापेक्षा एखाद्या पात्र व्यक्तीकडे बँकांचं नेतृत्त्व सोपवायला हवं. बँक चालवण्यासाठी नोकरशहा पर्याय असू शकत नाही. बँकांची धुरा योग्य व्यक्तींकडेच द्यायला हवी,' असं परखड मत राजन यांनी व्यक्त केलं. राजन यांनी रिझर्व्ह बँकेतील त्यांचा अनुभवदेखील यावेळी सांगितला. 'गव्हर्नर म्हणून काम करताना अनेक प्रकारचे नोकरशहा भेटले. त्यामुळे वेगवेगळे अनुभव आले. या काळात काही चांगले अनेक अधिकारी भेटले. तर अनेक अधिकारी असेही होते, ज्यांना सुधारणांसाठी केलेले प्रयत्न समस्या वाटायचे,' असा अनुभव राजन यांनी बोलून दाखवला. सध्याच्या देशात मंत्र्यांची भूमिका नोकरशहा पार पाडत आहेत. खरंतर मंत्र्यांनी नोकरशहांना आदेश द्यायला हवेत. मात्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्यांऐवजी नोकशहा सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी