शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Raghav Chadha : "भाजपाला पराभवाची भीती, INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:44 IST

Raghav Chadha : अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी भाजपावर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे. 

राघव चढ्ढा म्हणाले की, "आता पुढचा नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हा क्रम इथेच थांबणार नाही, कारण यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना अटक होणार आहे. केरळमध्ये पिनाराई विजयन यांना अटक होईल, त्यानंतर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना अटक होईल."

"महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना अटक होणार आहे. या राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपाला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपाला पराभवाची भीती आहे. भाजप एकटाच शर्यतीत उतरला तर साहजिकच निवडणूक जिंकेल. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकायचं आहे."

"इंडिया आघाडीचा एकही उमेदवार निवडणूक लढला तर भाजपाच्या जागा कमी होतील. अशा स्थितीत भाजपाला पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकत आहे. कारण एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही आणि कोर्टाच्या फेऱ्या मारत राहणार. या योजनेअंतर्गत भाजपा केजरीवाल यांना अटक करणार आहे."

"भाजपाचे पुढील लक्ष झारखंडवर आहे, 14 लोकसभा जागा असलेले राज्य. कारण या सर्व जागांवर भाजपाची अवस्था वाईट आहे. अशा स्थितीत ते हेमंत सोरेन यांना अटक करणार आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा त्यांची पिळवणूक करत आहे. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाईल. या देशात एक पक्ष आणि एक नेता हे भाजपाचे उद्दिष्ट आहे. देशाची लोकशाही धोक्यात येईल" असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी