शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

राफेल विमानांमुळे भारताची सामरिक क्षमता वाढेल, हवाई दलाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:00 IST

राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. राफेलची विमाने दर्जेदार असून, या विमानांमुळे भारताच्या सामरिक क्षमतेत अभूतपूर्व वाढ होणार असल्याचा दावा हवाई दलाने केला आहे. राफेल विमान करारावर टीका करत असलेल्यांनी या विमानांच्या खरेदीसाठी ठरवण्यात मापदंड आणि खरेदी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, असे हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एस.बी. देव यांनी सांगितले. 58 हजार कोटी रुपयांच्या राफेल करारावरून सध्या विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. एअर मार्शल एस. बी. देव म्हणाले, हे एक चांगले विमान आहे. त्याची क्षमता उच्च दर्जाची आहे आणि या विमानाचे उड्डाण करण्याची आम्ही वाट पाहत आहोत . या विमानांमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत आव्हानाचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होईल, सामरिक क्षमतेत  एका कार्यक्रमामध्ये राफेल विमान कराराबाबत विचारणा करण्यात आली असता देव यांनी ही माहिती दिली. राफेल विमान खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला होता. 2016 साली या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. या करारांतर्गत भारत फ्रान्सकडून 58 हजार कोटी रुपयांमध्ये 36 विमाने खरेदी करणार आहे. मात्र विमानांच्या किमतीमुळे हा करार वादात सापडला आहे.  दरम्यान, राजकारणात गाजणारा राफेल विमान कराराचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. राफेल करार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राफेल डीलमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करत वरिष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीचा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्यानं राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. राफेल कराराबद्दल मोदी देशाशी खोटं बोलले, असा घणाघाती आरोप राहुल यांनी लोकसभेत केला होता. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलPoliticsराजकारण