शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राफेल, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सामर्थ्य वाढणार- हवाई दल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:22 IST

विमानांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं

गाजियाबाद: राफेल विमानं आणि एस-400 क्षेपणास्त्रांमुळे हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटलं. हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विमानांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. विमान अपघात कमी व्हावेत, यासाठी हवाई दलाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास सज्ज आहोत. राफेल विमान आणि एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. हवाई दलाची विमानं अपघातग्रस्त होत असल्याच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलं. 'सततच्या अपघातांमुळे हवाई दलाचं दुहेरी नुकसान होतं. विमानांच्या अपघातामुळे आर्थिक फटका बसतो. यासोबतच युद्ध काळातील क्षमतेवरदेखील परिणाम होतो,' असं हवाई दल प्रमुख म्हणाले. विमानांच्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बी. एस. धनोआ यांनी दिली. 'हवाई दलाचे वैमानिक आणि तंत्रज्ञांना अधिकाधिक चांगलं प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मानवी चुका कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं धनोआ म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलfighter jetलढाऊ विमान