शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राफेलपासून पुलवामापर्यंत, लोकसभा निवडणुकीत गाजणार हे सहा मुद्दे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 17:06 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागणार असून, विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपाला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राफेल विमान करारापासून ते पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे मुद्दे गाजणार आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने 17व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीचे औपचारिक बिगूल वाजले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा विरुद्ध इतर विरोधी पक्ष अशीच मुख्य लढत रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागणार असून, विविध मुद्द्यांवरून मोदी आणि भाजपाला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राफेल विमान करारापासून ते पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे मुद्दे गाजणार आहेत. पुढच्या सव्वा दोन महिन्यांच्या काळात हे मुद्दे लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा ठरवतील अशी दाट शक्यता आहे.हे आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गाजणारे मुद्दे 1 - राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ठरणार कळीचा विषय पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे आम्ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. आमच्या सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक असा धाडसी मोहिमा पार पडल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर पुलवामा हल्ल्यावरून काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरत आहे. तसेच जवानांच्या शौर्याचा गैरवापर मोदींकडून होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्याबरोबरच राफेल विमान करारामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मोदींनी आपल्या मित्रांना फायदा मिळवून दिल्याचा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. 

2 - शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करून, आश्वासने देऊन भाजपा सरकार सत्तेवर आले होते. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान, तसेच नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असलेल्या 6 हजार रुपयांचा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे.  मात्र गेल्या पाच वर्षांत शेतीच्या क्षेत्रात सरकारकडून काम झाले नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारची कोंडी केली आहे. त्यामुळे निवडणुकांदरम्यान, शेतकऱ्यांचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे.

  3 - रोजगार घटलेला रोजगार आणि बेरोजगारांच्या वाढत्या संख्येचा मुद्दाही यावेळी प्रचारात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धडाकेबाज प्रचारसभांमध्ये दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात बेरोजगारी वाढली असल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपाची कोंडी केलेली आहे. तसेच रोजगाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारमधील नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.   4 - घराणेशाही विरुद्ध योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश    घराणेशाहीवरून भाजपाकडून काँग्रेसला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच प्रियंका गांधींच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर भाजपाकडून होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांची धार अधिकच तीव्र झाली आहे. मात्र काँग्रेसकडूनही त्याला तितकाच जोरदार प्रतिकार होत आहे. विविध योजनांना आलेले अपयश, अंमलबजावणीमधील अपयश यावरूनही सरकारला घेरण्यात येत आहे. मेक इन इंडिया, शेतकरी, दलित, महिला सुरक्षा याबाबतीत सरकारला आलेल्या अपयशाचा पाढा काँग्रेसकडून वाचण्यात येत आहे.    5 - जात भारतातील प्रत्येक निवडणुकीत जात आणि धर्म हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात. दरम्यान, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवर होत असलेल्या अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप काँग्रेसकडून होत आहे. त्यासाठी उना येथील घटना, रोहिल वेमुला प्रकरण तसेच गेल्यावर्षी  2 एप्रिल रोजी भारत बंददरम्यान झालेला हिंसाचार यांचे उदाहरण दिले जात आहे. तर भाजपाकडून आर्थिक निकषावर देण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. या निर्णयामुळे सवर्ण मतदार आपल्याकडे आकर्षित होईल, असा भाजपाला विश्वास आहे.  6 - राम मंदिर आणि हिंदुत्व 1990 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. त्यातच स्वबळावर बहुमत मिळाल्यानंतरही भाजपाला राम मंदिराच्या मुद्द्यावर काही आश्वासक अशी कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून, तो सोडवण्यासाठी आता मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह, विश्व हिंदू परिषद आणि  अन्य हिंदू संघटना या मुद्द्यावर आक्रमक आहेत. तर काँग्रेसही आपल्या खांद्यावरील सेक्युलॅरिझमची धुरा सोडून सौम्य हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. राहुल गांधी हे  गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीवेळी मंदिराना भेटी देत असल्याचे दिसत होते.  त्यामुळे यावेळीही निवडणुकीत राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rafale Dealराफेल डीलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी