शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Kuldeep Nayyar Death :...तर लाहोर भारतात असतं; नय्यर यांनी घेतली होती रॅडक्लिफची मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:16 IST

Kuldeep Nayyar Death : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतामध्ये सियालकोट येथे १४ आॅगस्ट १९२३ झाला होता. फाळणीनंतर आता सियालकोट पाकिस्तानामध्ये आहे. बी. ए आणि एलएलबीचे शिक्षण लाहोरमध्ये घेतल्यावर त्यांनी नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. ते द स्टेस्टमॅन या वर्तमानपत्राच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक होते. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांत त्यांनी लेख लिहिले आणि विविध विषयांची ओळख भारतीयांना करुन दिली. ते इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमले गेले, त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही भूमिका बजावली होती. पत्रकारितेच्या महत्त्वाच्या योगदानात त्यांनी भारताची फाळणी करणार्या सिरिल रॅडक्लिफची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली होती.

लंडनमधील बाँड स्ट्रीटवर रॅडक्लिफला भेटायला नय्यर गेले होते. भारताच्या फाळणीच्या वेळेस झालेली घाई आणि धांदल यावर बरीच माहिती त्यांना यामधून मिळाली होती. भारताची फाळणी करणा-या रॅडक्लिफ यांना भारताच्या भौगोलिक, सामाजिक रचनेबाबत काहीही माहिती नव्हती फाळणीच्या अगदी काही दिवस आधी ते भारतात येऊन पोहोचले होेेेते. अत्यंत ढोबळ विभागणी करुन ते घाईने परतले. रॅडक्लिफ यांनी फाळणी केल्यावर एका सहकार्याने त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून दिली. पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळालेले नाही हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लाहोर पाकिस्तानला द्यायचे ठरवले. अन्यथा लाहोर भारतातच राहिले असते. 

फाळणीच्यावेळेस सरकारने सोपवलेले काम पूर्ण करण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नव्हते असेही त्यांनी नय्यर यांना सांगितले होते. मात्र नंतर या फाळणीमुळे लाखो लोकांना प्राण गमवावे लागल्याचे समजताच आपल्याला दुःख झाले असे सिरिल यांनी नय्यर यांना सांगितले होते. माझ्याकडे दोन-तीन वर्षांचा अवधी असता तर फाळणी नीट करता आली असती असेही रॅडक्लिफ यांनी सांगितले होते. रॅडक्लिफ यांनी फाळणीचे 'काम' केल्याबद्दल ब्रिटिश सरकारने दिलेले ३००० पौंड नाकारले होते.

नय्यर यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते.  बांगलादेश निर्मितीच्यावेळेस स्थानिकांवर झालेले अत्याचार असो वा अण्णा हजारे यांचे आंदोलन, ते व्यक्त होत राहिले. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे वादही निर्माण झाले. बियाँड द लाइन्स, इंडिया अफ्टर नेहरु, वॉल ऑफ वाघा, द जजमेंट, द मार्टियर, इंडिया पाकिस्तान रिलेशन अशी १५ पुस्तके त्यांनी लिहिली.

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरIndiaभारतNew Delhiनवी दिल्ली