शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Kuldeep Nayyar Death :...तर लाहोर भारतात असतं; नय्यर यांनी घेतली होती रॅडक्लिफची मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:16 IST

Kuldeep Nayyar Death : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतामध्ये सियालकोट येथे १४ आॅगस्ट १९२३ झाला होता. फाळणीनंतर आता सियालकोट पाकिस्तानामध्ये आहे. बी. ए आणि एलएलबीचे शिक्षण लाहोरमध्ये घेतल्यावर त्यांनी नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. ते द स्टेस्टमॅन या वर्तमानपत्राच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक होते. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांत त्यांनी लेख लिहिले आणि विविध विषयांची ओळख भारतीयांना करुन दिली. ते इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमले गेले, त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही भूमिका बजावली होती. पत्रकारितेच्या महत्त्वाच्या योगदानात त्यांनी भारताची फाळणी करणार्या सिरिल रॅडक्लिफची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली होती.

लंडनमधील बाँड स्ट्रीटवर रॅडक्लिफला भेटायला नय्यर गेले होते. भारताच्या फाळणीच्या वेळेस झालेली घाई आणि धांदल यावर बरीच माहिती त्यांना यामधून मिळाली होती. भारताची फाळणी करणा-या रॅडक्लिफ यांना भारताच्या भौगोलिक, सामाजिक रचनेबाबत काहीही माहिती नव्हती फाळणीच्या अगदी काही दिवस आधी ते भारतात येऊन पोहोचले होेेेते. अत्यंत ढोबळ विभागणी करुन ते घाईने परतले. रॅडक्लिफ यांनी फाळणी केल्यावर एका सहकार्याने त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून दिली. पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळालेले नाही हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लाहोर पाकिस्तानला द्यायचे ठरवले. अन्यथा लाहोर भारतातच राहिले असते. 

फाळणीच्यावेळेस सरकारने सोपवलेले काम पूर्ण करण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नव्हते असेही त्यांनी नय्यर यांना सांगितले होते. मात्र नंतर या फाळणीमुळे लाखो लोकांना प्राण गमवावे लागल्याचे समजताच आपल्याला दुःख झाले असे सिरिल यांनी नय्यर यांना सांगितले होते. माझ्याकडे दोन-तीन वर्षांचा अवधी असता तर फाळणी नीट करता आली असती असेही रॅडक्लिफ यांनी सांगितले होते. रॅडक्लिफ यांनी फाळणीचे 'काम' केल्याबद्दल ब्रिटिश सरकारने दिलेले ३००० पौंड नाकारले होते.

नय्यर यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते.  बांगलादेश निर्मितीच्यावेळेस स्थानिकांवर झालेले अत्याचार असो वा अण्णा हजारे यांचे आंदोलन, ते व्यक्त होत राहिले. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे वादही निर्माण झाले. बियाँड द लाइन्स, इंडिया अफ्टर नेहरु, वॉल ऑफ वाघा, द जजमेंट, द मार्टियर, इंडिया पाकिस्तान रिलेशन अशी १५ पुस्तके त्यांनी लिहिली.

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरIndiaभारतNew Delhiनवी दिल्ली