शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

चीनला टक्कर देण्यासाठी INS Kalvari सज्ज, रडारलाही नाही सापडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 13:39 IST

भारताचं नौदल सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. गेल्या 11 वर्षांनंतर भारतीय नौदल एका ताकदवान पाणबुडीचा स्वतःच्या ताफ्यात समावेश करणार आहे

नवी दिल्ली, दि. 4 - भारताचं नौदल सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. भारतीय नौदल लवकरच एका ताकदवान पाणबुडीचा स्वतःच्या ताफ्यात समावेश करणार आहे. पुढच्या महिन्यात ही पाणबुडी समुद्रात उतरवली जाणार आहे. चीनच्या कथित युद्धाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताकडे अशी ताकदवान पाणबुडी असणं ही आनंददायक घटना आहे. INS Kalvari वर्गातील ही पाणबुडी शत्रूला न दिसताही त्याचा वेध घेणार आहे. या पाणबुडीमुळे समुद्राच्या आतून युद्ध करण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होणार आहे. भारताजवळ 13 पाणबुड्या होत्या. ज्यांची संख्या आता हटवून 7 करण्यात आली आहे. यातील ब-याचशा पाणबुड्या या 20 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यामुळे भारतानं स्वतःचं नौदल सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला आहे. जेणेकरून युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास या पाणबुड्यांच्या योग्य प्रकारे वापर करता येईल. सद्यस्थितीत 6 मधली एक पाणबुडी लवकरच ताफ्यात दाखल होणार आहे. INS Kalvari हिंद महासागरात भारताच्या समुद्र सीमेचं संरक्षण करणार आहे. चीनजवळ सद्यस्थितीत 60 पाणबुड्या आहेत. चीननं जास्त करून पाणबुड्या या हिंद महासागरात नजर ठेवण्यासाठी सोडल्या आहेत. तसेच चीन स्वतःच्या पाणबुड्यांच्या माध्यमातून भारताच्या समुद्र हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशाला पाणबुड्या विकल्या आहेत. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली पाणबुडीही कराचीला पाठवली आहे. चीनजवळ आता आण्विक हल्ल्यासाठी तयार असलेल्या 5 पाणबुड्या असून, डिझेलवर चालणा-या 54 पाणबुड्या आहेत. पेंटॉगॉनच्या रिपोर्टनुसार 2020पर्यंत चीनकडे 78 पाणबुड्या असतील. 

लष्करातील कुठल्याही एका दलाच्या बळावर युद्ध जिंकणे शक्य नाही. यासाठी तिन्ही दलांची एकत्रित कामगिरी आवश्यक असते. तिन्ही दलांच्या एकत्रित कामगिरीमुळेच हे शक्य आहे. प्रशांत महासागर ते अ‍ॅटलांटिक महासागरापर्यंत भारतील नौदलाचा दबदबा आहे, असंही नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा म्हणाले होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132व्या दीक्षान्त समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. लांबा म्हणाले, ‘‘गल्फ ऑफ एडन, प्रशांत महासागर तसेच अ‍ॅटलांटिक महासागरात भारतीय नौदलाचा मुक्त संचार आहे. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी नौदल सक्षम आहे. कुठल्याही परिस्थितीसाठी नौदल सज्ज आहे.’’ भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ एका दलाच्या ताकदीवर ते जिंकता येणार नाही. यासाठी तिन्ही दलाचे एकत्रित प्रयत्न हवेत. यासाठीच्या तिन्ही दलाची एकत्रित अशी नवीन कमान होणे आवश्यक आहे. शासकीय पातळीवर असे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय तंत्रज्ञान आणि स्वदेशी जहाजांच्या निर्मितीला नौदलाने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 200 जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. 41 जहाजांचे काम सुरू आहे. यात पाणबुड्यांचाही समावेश आहे. देशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देत मेक इन इंडियाच्या योजनेनुसार देशातील उद्योगांच्या सहकार्याने नव्या जहाजांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आयएनएस विराट नौदलातून निवृत्त झाली आहे. विक्रांत 2च्या बांधणीचे काम सुरू आहे. विराटचे म्युझियम बनवण्याबाबत कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही लांबा म्हणाले होते.