शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

जिवंत असो वा मृत त्यांना खाणीतून लवकर बाहेर काढा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र व राज्याला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 03:17 IST

मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली : मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले. अडकलेले सर्व मग ते जिवंत असो वा मृत त्यांना लवकर खाणीतून बाहेर काढा, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे.न्यायालयाने म्हटले की, खाणीत अडकलेले सर्व लोक जिवंत असू देत हीच सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. या मदतकार्यासाठी लष्कराची मदत का घेण्यात आली नाही, असाही सवाल न्यायालयाने सरकारला केला. लष्कराला पाचारण करायचे की नाही हा निर्णय गेले काही दिवस लालफितीच्या कारभारात अडकला होता.या बचावकार्याला गती येण्यासाठी न्यायालय काही हंगामी आदेश देण्याची शक्यता आहे. मेघालयमधील पूर्व जैंतिया जिल्ह्यामधील खाणीत अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत याकरिता एक याचिका दाखल झाली आहे. अडकलेल्या लोकांची मुक्तता करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नौदल, कोल इंडिया यांच्या सहकार्याने १४ डिसेंबरपासून मदतकार्य सुरू केल्याचे मेघालय सरकारने याआधीच न्यायालयाला सांगितले होते. मात्र, हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.मदतकार्यात अडचणीमेघालयमध्ये कोळसा खाणींमध्ये चोरटे बोगदे खणले जातात. अशा कामांत बालमजुरांचा वापर केला जातो. क्सान येथील खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणला जात असताना जवळच्याच नदीचे पाणी त्यात घुसून सर्व खाणकामगार आत अडकले.उच्चशक्तीचे विजेचे पंप तसेच आणखी आवश्यक साधनसामग्री नसल्याने मदतकार्य थंडावले होते. मात्र, हवाई दलाच्या विमानातून ही साधनसामग्री नजीकच्या ठिकाणापर्यंतची व्यवस्था झाल्याने मदतकार्यास वेग आला.खाणीत अडकलेले आपले सगेसोयरे जिवंत असतील ही आशा त्यांच्या नातेवाईकांनी सोडून दिली आहे. अडकलेल्यांचे मृतदेह जरी बाहेर काढले तरी ते पुरेसे आहे, असे या नातेवाईकांपैकी एकाने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय