शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी आंदोलनाचा प्रश्न : शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:56 IST

Rahul Gandhi : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना  भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना  भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.  तसेच  आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या  पाचशेंहून अधिक शेतकऱ्यांची सोमवारी संसदेत  यादी सादर करून सरकारकडे भरपाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्यावरून सोमवारी संसदेत गदारोळ होण्याचे संकेत मिळतात.

राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की,  एका दिवसापूर्वी सरकारने म्हटले होते की, आमच्याकडे शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा आकडा नसल्याने भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी पंजाब सरकारकडून आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा तपशील मागावला. यात  ५०४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५-५ लाख रुपयांची भरपाई दिली असून १५२ कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. इतरांनाही लवकरच नोकरी दिली जाणार आहे. 

यादी संसदेत सोमवारी सादर करणार- राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या ५०४ शेतकऱ्यांची नांवे, पत्ता आणि फोन नंबरसह यादी जारी करून ही यादी सोमवारी संसदेत सादर करून हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.- सूत्रांनुसार काँग्रेस सोमवारी संसदेत सरकारवर दबाव आणण्यासाठी अन्य पक्षांशी चर्चा करीत आहे. जेणेकरून सामायिक रणनीतीनुसार सरकारवर दबाव आणता येईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेस